Trending:


landslides : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलन आणि पुरामुळे १४ जणांचा मृत्यू

Nepal landslides : नेपाळमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पुरामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे.


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक, शिंदे सरकारला कोंडित पकडणार?

Marathi News Live Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.


Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?

Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं? नवी दिल्ली : मद्य विक्री धोरणप्रकरणात अटकेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा न्यायालयातील मुक्काम आणखी वाढला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, दिल्ली हायकोर्टानं (Highcourt) जामिनाच्या निर्णयाला दिलेल्या स्थगिती दिल्याने, त्या विरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्चात याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी, अरविंद केजरीवाल यांनी जामिनाला दिलेल्या स्थगिती प्रकरणी दिल्ली हायकोर्टाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहावी, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले. आता, दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना धक्का दिला आहे. कारण, ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन रद्द केला आहे. त्यातच आज अरविंद केजरीवाल हे कोर्टरुममध्ये असताना त्यांची शुगर लेव्हल खालावली.


Jharkhand Politics : झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM

Champai Soren resigns : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झारखंड हायकोर्टाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केल्याने त्यांची तब्बल पाच महिन्यांनंतर २८ जून रोजी तुरुंगातून सुटका झाली होती. आता ते पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्रीपद सांभाळणार आहे.


Raj Thackeray: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी...


Vidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय...या निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट झालं...महायुती आणि महाविकास आघाडीला अधिकची एक जागा निवडून आणायची आहे...त्यामुळे निवडणुकीत क्रॉस वोटिंग किंवा घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...पाहुया एक स्पेशल रिपोर्ट... विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आता चुरशीची निवडणूक होणार हे नक्की झालंय... निवडणूक बिनविरोध होईल अशी अटकळ असतानाच बारावा उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक निश्चित झालीय... भाजपकडून - १. पंकजा मुंडे २. योगेश टिळेकर ३.डॉ. परिणय फुके ४. सदाभाऊ खोत ५. अमित गोरखे यांना उमेदवारी देण्यात आलीय... शिंदेंच्या शिवसेनेकडून १. भावना गवळी २. कृपाल तुमाणे तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून १. राजेश विटेकर २. शिवाजीराव गर्जे असे महायुतीकडून ९ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत... महाविकास आघाडीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातवांना तिकीट देण्यात आलंय... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जंयत पाटलांना पाठिंबा दिलाय... तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवलंय..


Majha Vitthal Mazi Wari : संत तुकाराम महाराज ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अपडेट्स एका क्लिकवर

रामकृष्णहरी माऊली म्या सिद्धेश ताकवले माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत.. चलारे वैचला रे वैष्णव हो जाऊ पंढरीसी प्रेमामृत खुण मागो त्या विलासी माऊली सोपान काकांच्या अभंगाच्या या ओळी.. आज संत सोपान काकांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान झालं बगा. प्रस्थानायेळी ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत ह्यो वैष्णवांचा महामेळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाला बगा. तर तिकडं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी लोनी काळभोरमधून निघून यवतमदी मुक्कामी आसनार हाय. माऊली दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करुन संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवडमदी मुक्कामी हाय. पालखी सासवडमदी आल्या आल्या माऊलींच्या पालखीचं जंगी स्वागत बी करन्यात आलं. वारकऱ्यांच्या पाहुनचारात सासवडकर तसुभरही मागे पडली न्हाई बगा. माऊली तुमास्नी दिलेल्या शब्दाप्रमानं घरबसल्या पालखीचं दर्शन तुमास्नी घडवनार हाय. आता बी म्या तुमास्नी घेऊन जानारेय माऊलींच्या पादुकांचं दर्शन घडवाया थेट सासवडमदी चला की जाऊया. माऊली संत सोपान काकांच्या पालखीचं आज सासवडमधून प्रस्थान झालं.. यंदा या सोहळ्याचं 120 वं वर्ष आहे.. 13 दिवसांचा प्रवास करून ही पालखी 14 व्या दिवशी पंढरपूर मध्ये पोहोचते.. प्रस्थान झाल्यावर आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने माऊली सासवडमध्ये पालखी आल्यानंतर अनेक त्रुटी पाहायला मिळाल्या असे आमदार संजय जगताप यांनी म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायला जवळपास रात्रीचे साडे दहा वाजल्या वारकरी पालखी तळावर यायला वेळ लागला. याचसंदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमची वारकरी शिवलीला पाटीलनं. या वारीमंदी ही वारकरी वारीत कुठं बरं राहत असतील असा बी प्रश्न तुमास्नी पडला आसलंच.. चला तर मग तुमास्नी म्या घेऊन जानारेय वारीत... तिकडं शिवलीला पाटील तुमास्नी दावनारेय. चला संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात माजी मंत्री विजय शिवतारे सहभागी झाले. काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात विजय शिवातरे देखील सहभागी झाले होते. पालखी सोहळा सासवड नगरीत येणे म्हणजे आमच्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचं म्हणाले बगा त्यांच्याशी संवाद साधलाय़ आमचा प्रतिनइधी जयदीप भगतनं


NEET Paper leak 2024 Update: विद्यार्थी-पालकांशी संभाषण, बँक व्यवहार, ॲडमिट कार्ड; फक्त NEET नव्हे, अनेक परीक्षेत घोळ, धक्कादायक माहिती समोर

NEET Paper leak 2024 Update: लातूर: लातूर नीट पेपरफुटीप्रकरणी अटक (NEET Paper leak case) असलेल्या दोन आरोपींना सहा तारखेपर्यंत सीबीआय (CBI) कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर सीबीआय पथकाने तपासाचा वेग वाढवला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून आजपर्यंत झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे आणि तपशील गोळा करण्यात आला आहे. सीबीआय पथकाने तपासाची गती आणि दिशा ठरवून कामाला सुरुवात केली आहे. नीट पेपर प्रकरणात सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर अनेक वेगवान हालचाली घडल्या...


BSF Constables Missing: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल गायब, लास्ट लोकेशन परराज्यात, आईला वेगळाच संशय

Women Mysteriously Missing From BSF Academy: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. त्या गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. तर या प्रकरणी एका महिलेल्या आईने मोठी भीती व्यक्त केली आहे.


ABP Majha Headlines : 5 PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता , दानवेंनी सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक महायुती सरकारकडून १ लाख ८ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू, ७० हजार जणांना नियुक्त पत्र प्रदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेसनात नवा कायदा आणणार, फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोलमाफी, आजपासून २१ जुलैपर्यंत सवलत लागू मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक, संबंधित मंत्र्यांमार्फत पाणीपुरवठ्याची माहिती देण्याचे बीएमसीच्या जलअभियंत्यांना निर्देश मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स, टीशर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत गाजला... कॉलेजने तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल, तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत पुण्यात आठ तालुक्यांतील पर्यटनस्थळ, गडकिल्ले, धबधब्यांवर जमावबंदी, भुशी डॅम परिसर, ताम्हिणी घाटातील दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


Weather : सावधान! आज राज्यातील 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


मोदी-शहांचे विश्वासू

सन १९८९मध्ये ते परिषदेचे ‘राष्ट्रीय महामंत्री’ झाले आणि पुढील दोन वर्षांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. याच काळात हिमाचल प्रदेशातील विलासपूर मतदारसंघातून ते विधानसभेत पोहोचले. प्रारंभी विरोधी पक्षनेता आणि पुढील निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अशी त्यांची वाटचाल झाली.


Breaking News LIVE Updates : अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या सुचना

Today Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...


Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती

Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 116 जणांनी जीव गमावला आहे. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी भोले बाबाच्या सत्संगसाठी मोठी गर्दी झाली होती. पण हे भोले बाबा नेमके आहेत तरी कोण? एवढी मोठी दुर्घटना घडली तरी कशी? विश्व हरी भोले बाबा यांना त्यांचे अनुयायी भोले बाबा म्हणून ओळखतात. भोले बाबा आणि वाद हे फार जुनं समीकरण आहे. भोले बाबांबाबत सांगताना स्थानिकांनी सांगितलं की, कासगंज जिल्ह्यातील पटियाली येथील बहादूर नगर येथील रहिवासी असलेले विश्व हरी भोले बाबा यांनी साधारणतः 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातील नोकरी सोडून सत्संग सुरू केलं. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशात भोले बाबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत. तसं पाहायला गेलं तर, त्यांचे अनुयायी मीडियापासून अंतर ठेवूनच असतात. भोले बाबांच्या एका भक्तानं सांगितलं की, त्यांच्या आयुष्यात कोणीच गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेनं हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे, हे त्यांना कळलं. त्यांचं खरं नाव सूरज पाल असून ते कासगंजचा रहिवासी आहेत. भोले बाबांच्या अनुयायानं पुढे बोलताना सांगितलं की, ते दर मंगळवारी सत्संगला जातात. नुकताच मैनपुरी येथे सत्संग झाला. त्यानंतर हाथरसमध्ये सुरू करण्यात आला. कोरोनाच्या काळातही भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या सत्संगाला फक्त 50 लोकांचीच परवानगी मागितली होती, पण नंतर 50 हजारांहून अधिक लोक त्यांच्या सत्संगाला आले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती.


Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर हेही वाचा : देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव

Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या (CM Ladki Bahin Yojna) अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एक मागणी केली आहे. राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना (Muslim Women) या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.


जागतिक राजकारण आणि भारत

G 7 Summit Italy: 'जी ७' परिषद, युक्रेन युद्धाबाबतची शांतता परिषद, अमेरिकेने रशियाचे पैसे वापरण्याविषयी केलेले वक्तव्य या साऱ्या पार्श्वभूमीवर 'ग्लोबल साउथ', 'ब्रिक्स' आणि भारत यांचा विचार करायला हवा. आताची बदललेली बाजू आपणही समजून घ्यायला हवी.


असांज आता काय करणार?

Julian Assange :'हॅकिंग विश्वाचा रॉबिनहूड' अशी ओळख असणारे ज्युलियन असांज यांची नुकतीच सुटका झाली. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा...


Pune Tourism: पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश

Prohibition orders at tourist places in Pune district after bhushi dam accident


Zero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तर

ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत.. ज्यांच्या समर्थनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी काल सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.. त्या राहुल गांधींसंदर्भातली बातमी.. काल भाजपवर आरोप करत असताना राहुल गांधींनी जी जोरदार बॅटिंग केली.. त्यातीलच वक्तव्य हाताशी धरत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोक सभेत राहुल गांधींना क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावासाठी लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं.. आणि मोदींनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरींचा उल्लेख केला.. सोबतच राहुल गांधींच्या कालच्या भाषणाला उत्तरं दिलं..राहुल गांधींच्या वक्तव्याचा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध व्यक्त केला होता.. आज सकाळपासूनचं भाजपनं देशभरात निदर्शनं केली.. टीका केली.. फक्त भाजपच नाही तर आज मित्रपक्षांकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध बघायला मिळाला. भाजपाच्या मित्रपक्षांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप मित्रपक्षांमध्ये कशी एकवाक्यता दिसली.. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही राहुल गांधींवर पलटवार केलाय.. तो आधी पाहुयात.. आज म्हणायला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान बोलणार असे जरी असले, तरी उत्सुकता होती... ती राहुल गांधींना मोदी काय उत्तर देणार ह्याची... त्यांच्या भाषणाचा एक मोठा भाग राहुल गांधींवर असणार.. ही अपेक्षा होती. आणि मोदींनी अपेक्षाभंग केला नाही.. १० वर्षानंतर देशाला विरोधी पक्ष नेता मिळाला आणि काल ते पद भूषवणाऱ्या राहुल गांधींचे पहिलेच भाषण होते... त्यात त्यांचा रोख निवडणुकीसारखाच मोदी सरकार विरोधी होता... त्यालाच आज त्याच आवेशात पंतप्रधानांनी उत्तर दिले... मोदी भाषणाला उभे राहिले तेव्हापासूनच विरोधी बाकांवरून गोंधळ ऐकू येऊ लागला... मात्र मोदींनी हि न थांबता आपले भाषण सुरु ठेवले.. आणि राहुल गांधींनी काल केलेल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढलं.. आणि राहुल गांधी यांच्या हिंदू या शब्दावरुन केलेल्या टीकेला विशेष उत्तर दिलं.. पाहुयात.. नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं.. पण, जसं भाजपच्या मित्रपक्षांनी देशभरात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.. अनेक ठिकाणी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली.. बॅनरबाजी केली.. तिथं काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही राहुल गांधीचं समर्थन सुरु केलंय.. आणि त्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातून.. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं वक्तव्य केलं.. तर राहुल गांधींनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवल्याची टीका, संजय राऊतांनी केली.. पाहुयात..


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


Mumbai Central Public Park : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

Mumbai Central Public Park On 300 Acres : मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित होणार आहे. ३०० एकरवर हे उभारण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


Nanded | एसटी बस वाहक आणि प्रवाशात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ST Driver and Passanger Rada in Nanded


Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका"

Uddhav Thackeray and Aaditya Thackeray : "Mahalaxmi Race Course ची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका" Mahalaxmi Racecourse 120 Acres Land Handover To BMC: मुंबई : महालक्ष्मी रेस कोर्सची (Mahalaxmi Race Course) 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या (BMC) ताब्यात देण्यास राज्य सरकारनं (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी (Mumbai News) रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे. 1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या जमिनीवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रकल्पात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनर असा समावेश होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. ही 211 एकर जागा आहे. त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल. आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती.


Sawantwadi News | सावंतवाडी ZP शाळेचा एक भाग कोसळला

Sawantwadi news zp school bad condition


अन्नपूर्णांचा आधार -प्रेमाताई पुरव

Prematai Purav : प्रेमाताई मूळच्या गोव्याच्या. लहानपणीच त्या गोवा मुक्ती संग्रामात उतरल्या. बंदुक चालवणे, बॉम्ब तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवणे, दारूगोळा लपवणे अशा क्रांतिकारी कामांत त्यांचा सहभाग असे.


जायकवाडीवर ड्रोनद्वारे टेहळणी

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पावर मंगळवारी रात्री दहानंतर चार ते पाच ड्रोन भिरभिरताना आढळून आले. या प्रकाराने खळबळ उडाली.


Husband Killed Wife: व्हिडिओ कॉल जीवावर बेतला, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलं

Nagpur Crime: आरोपी विकी विर्क आणि मयत मन्नत कौर यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता आणि दोघांना 2 वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र विकीला जुगाराचे सवय जडली. त्यात तो मन्नतच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत मन्नत ही विकीपासून दूर तिच्या माहेरी राहत होती.


Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial Report

नागपुरात झालेल्या आंदोलनाबाबत आता एक नवी माहिती समोर आलीय. या आंदोलनात नागपूरच्या बाहेरच्यांचा काही सहभागी होता का असा संशय उत्पन्न झालाय. स्मारक समितीने सुरू केलेल्या सौदर्यकरण प्रकल्पाला अचानक विरोध कसा काय सुरू झाला, इथपासून कालच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. या संदर्भात एबीपी माझाने थेट स्मारक समिती विश्वस्तांशी चर्चा केली... त्यातून कोणती माहिती समोर आलीय. पाहूया हा रिपोर्ट देशातलंच नाही तर जगातलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान... या ऐतिहासिक भूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा अंकूर पेरला, त्याचा आता जगभरात वटवृक्ष झालाय. मात्र इथल्या सौंदर्यीकरण प्रकल्पातील अंडरग्राऊंड कामाला विरोध करत १ जुलैला आंदोलन पेटलं. अंडरग्राऊंड सुरु असलेल्या विरोधाची कारणं जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने स्मारक समितीच्या विश्वस्तांशी चर्चा केली. त्यांनी दिलेली माहितीही या प्रकरणात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.