बातम्या

Trending:


Mumbai Central Public Park : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

Mumbai Central Public Park On 300 Acres : मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित होणार आहे. ३०० एकरवर हे उभारण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.


Devendra Fadnavis: फडणवीसांचे विरोधकांना थेट आव्हान; ...तर माझ्यावर हक्कभंग आणा

Devendra Fadnavis in Maharashtra Assembly : विधान परिषदेत सुरु असलेल्या चर्चेत विरोधी पक्षाने नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित केला आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर देखील सरकारला घेरले. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.


संकेतांवरची दुनिया

​​आव्हानं पेलताना आणि लिहिताना लेखकाला भोवतीची दुनिया समजून घ्यावी लागते. ही दुनिया कशी चालते, या प्रश्नाकडे लेखकाला यावंच लागतं. ही दुनिया अन्तस्थ संकेतांवर चालते, असं एक उत्तर आहे, पण ही दुनिया संकेतांवर चालते, हे सत्यसुद्धा संकेतांनी सूचित केलेलं असतं


Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती

Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची माती उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 116 जणांनी जीव गमावला आहे. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी भोले बाबाच्या सत्संगसाठी मोठी गर्दी झाली होती. पण हे भोले बाबा नेमके आहेत तरी कोण? एवढी मोठी दुर्घटना घडली तरी कशी? विश्व हरी भोले बाबा यांना त्यांचे अनुयायी भोले बाबा म्हणून ओळखतात. भोले बाबा आणि वाद हे फार जुनं समीकरण आहे. भोले बाबांबाबत सांगताना स्थानिकांनी सांगितलं की, कासगंज जिल्ह्यातील पटियाली येथील बहादूर नगर येथील रहिवासी असलेले विश्व हरी भोले बाबा यांनी साधारणतः 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातील नोकरी सोडून सत्संग सुरू केलं. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशात भोले बाबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत. तसं पाहायला गेलं तर, त्यांचे अनुयायी मीडियापासून अंतर ठेवूनच असतात. भोले बाबांच्या एका भक्तानं सांगितलं की, त्यांच्या आयुष्यात कोणीच गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेनं हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे, हे त्यांना कळलं. त्यांचं खरं नाव सूरज पाल असून ते कासगंजचा रहिवासी आहेत. भोले बाबांच्या अनुयायानं पुढे बोलताना सांगितलं की, ते दर मंगळवारी सत्संगला जातात. नुकताच मैनपुरी येथे सत्संग झाला. त्यानंतर हाथरसमध्ये सुरू करण्यात आला. कोरोनाच्या काळातही भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या सत्संगाला फक्त 50 लोकांचीच परवानगी मागितली होती, पण नंतर 50 हजारांहून अधिक लोक त्यांच्या सत्संगाला आले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती.


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


NEET Paper leak 2024 Update: विद्यार्थी-पालकांशी संभाषण, बँक व्यवहार, ॲडमिट कार्ड; फक्त NEET नव्हे, अनेक परीक्षेत घोळ, धक्कादायक माहिती समोर

NEET Paper leak 2024 Update: लातूर: लातूर नीट पेपरफुटीप्रकरणी अटक (NEET Paper leak case) असलेल्या दोन आरोपींना सहा तारखेपर्यंत सीबीआय (CBI) कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर सीबीआय पथकाने तपासाचा वेग वाढवला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून आजपर्यंत झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे आणि तपशील गोळा करण्यात आला आहे. सीबीआय पथकाने तपासाची गती आणि दिशा ठरवून कामाला सुरुवात केली आहे. नीट पेपर प्रकरणात सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर अनेक वेगवान हालचाली घडल्या...


Raj Thackeray: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी...


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 03 JULY 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 03 JULY 2024 देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


उद्धव, आदित्य, तेजस ठाकरेंचं मतदान

, ,


Zero Hour Guest Center : दानवेंची शिवी ते निलंबन; Neelam Gorhe चं सविस्तर उत्तर

विधान परिषदेतून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं झालं निलंबन... सत्ताधारी - विरोधकांमधले आरोप-प्रत्यारोप... येणारी विधान परिषद निवडणूक.. या सर्व विषयांवर बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं सभागृहात काल झालेल्या प्रकरणात निलंबन करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाचील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे.


Pune Tourism: पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश

Prohibition orders at tourist places in Pune district after bhushi dam accident


विधानपरिषदेमध्ये मराठा आरक्षणावरुन खडाजंगी; पाहा घ्या कोण काय म्हणालं

Vikram Kale Kapil Patil and Shambhuraj desai on Maratha reservation


IRCTC Ticket Booking: वेगळे आडनाव असलेल्या नातेवाईकांचे रेल्वे तिकीट बुक करणे अवैध? IRCTC ने दिले स्पष्टीकरण

IRCTC Clarification On Online Ticket Booking: सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या बातम्यांमध्ये असा दावा केला जात होता की, जर प्रवाशांची आडनाव वेगळी असेल तर त्यांना एकत्र तिकीट मिळणार नाही असे सांगितले जात होते. यावरून प्रवाशांमध्ये बराच गोंधळ झाला होता. तिकिट बुकिंग करण्याबाबत प्रवाशांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. परंतु आता यावर आयआरसीटीसीने पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे.


Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक, शिंदे सरकारला कोंडित पकडणार?

Marathi News Live Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.


Railway Ticket Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेच्या तिकीट दरात सवलत मिळण्याची शक्यता

Railway Ticket Concession For Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत देण्याच्या विचारात आहे. या सवलतीविषयी जाणून घेऊयात.


Bharat Ratna to Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न; राज्य सरकारमधील मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Shahu Maharaj: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे विनंती करणार असल्याचे सांगितले.


Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर हेही वाचा : देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न... नवाब मलिकही बैठकीला उपस्थित..मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या...वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला... लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार.. तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ.. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ११६ भाविकांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?

Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं? नवी दिल्ली : मद्य विक्री धोरणप्रकरणात अटकेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा न्यायालयातील मुक्काम आणखी वाढला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, दिल्ली हायकोर्टानं (Highcourt) जामिनाच्या निर्णयाला दिलेल्या स्थगिती दिल्याने, त्या विरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्चात याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी, अरविंद केजरीवाल यांनी जामिनाला दिलेल्या स्थगिती प्रकरणी दिल्ली हायकोर्टाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहावी, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले. आता, दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना धक्का दिला आहे. कारण, ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन रद्द केला आहे. त्यातच आज अरविंद केजरीवाल हे कोर्टरुममध्ये असताना त्यांची शुगर लेव्हल खालावली.


Pandharpur Wari Toll Free: पंढरीची वारी टोलमुक्त ! 21 जुलैपर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी जाहीर

Ashadhi wari toll free for warkari vehicles: आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफी करण्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.


Vidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय...या निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट झालं...महायुती आणि महाविकास आघाडीला अधिकची एक जागा निवडून आणायची आहे...त्यामुळे निवडणुकीत क्रॉस वोटिंग किंवा घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...पाहुया एक स्पेशल रिपोर्ट... विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आता चुरशीची निवडणूक होणार हे नक्की झालंय... निवडणूक बिनविरोध होईल अशी अटकळ असतानाच बारावा उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक निश्चित झालीय... भाजपकडून - १. पंकजा मुंडे २. योगेश टिळेकर ३.डॉ. परिणय फुके ४. सदाभाऊ खोत ५. अमित गोरखे यांना उमेदवारी देण्यात आलीय... शिंदेंच्या शिवसेनेकडून १. भावना गवळी २. कृपाल तुमाणे तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून १. राजेश विटेकर २. शिवाजीराव गर्जे असे महायुतीकडून ९ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत... महाविकास आघाडीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातवांना तिकीट देण्यात आलंय... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जंयत पाटलांना पाठिंबा दिलाय... तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवलंय..


Nawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP Majha

Nawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP Majha वळ विरोधी पक्षात आहे म्हणुन निधी दिला जात नाहीं हे दुर्दैवी आहे. आता आमदार म्हणुन मी त्यांच्या सोबत नाही आता मलाही निधी दिला जात नाही अशोक पवार राहूल जगताप हे कारखान्याचे अध्यक्ष असले तरी कारखाना हा शेतकऱ्यांचा असतो त्यांना मदत होणं गरजेचं आहे त्यामुळे अशा प्रकारे मदत न करणं योग्य नाही मकरंद पाटील शरद पवार यांच्या सोबत होतें त्यावेळीं त्यांच्या कारखान्यांना पैसै दिले नाहीत आता अजित पवार यांच्या सोबत आल्यानंतर तब्बल 500 कोटी रुपये दिले आहेत नवाब मलिक हे आता त्यांच्यासोबत आहे त्यामुळें त्यावर बोलणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जातीने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेल्या आणि त्यानंतर ईडीची वक्रदृष्टी वळून काही काळ तुरुंगवास भोगावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर आता पक्षाची मेहेरनजर झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले होते. मात्र, मंगळवारी रात्री मुंबईतील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नवाब मलिक ईडीच्या कोठडीतून बाहेर आले होते. सभागृहात आल्यानंतर ते सत्ताधारी बाकांवर बसले होते. या माध्यमातून त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजितदादा गटासोबत असल्याचा संदेश दिला होता. परंतु, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना तात्काळ जाहीर पत्र लिहून नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाबाबत नाराजी व्यक्त केली होती. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य ठरणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर नवाब मलिक हे उर्वरित दिवस अधिवेशनात दिसले नव्हते. अजित पवार यांनीही नवाब मलिक हे राष्ट्रवादीतील नेमक्या कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत मला कल्पना नसल्याचे म्हटले होते. एकूणच फडणवीस यांच्या दबावामुळेच अजितदादांना आपल्या एका सहकाऱ्याला अंतर द्यावे लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल नवाब मलिक यांची अजितदादांच्या बैठकीला असलेली उपस्थिती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


Stellar explosion: दोन तारे एकमेकांच्या खूप जवळ आल्यामुळे कधीही होऊ शकतो स्फोट, उघड्या डोळ्यांनी येणार पाहता

Stellar explosion: टी कोरोना बोरियालिस नावाच्या एका ब्लेज स्टारमध्ये लवकरच स्फोट होणार आहे. या स्फोटाची अचूक वेळ शास्त्रज्ञांना सांगता येत नाही परंतु हा उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. दोन तारे जवळजवळ असल्यामुळे हा स्फोट होणार आहे.


Encroachment Action In Lonavala : भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने शेकडो अनधिकृत हॉटेल्स व टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

Encroachment action in Lonavala : भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल्वे मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे.


ABP Majha Headlines : 5 PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता , दानवेंनी सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक महायुती सरकारकडून १ लाख ८ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू, ७० हजार जणांना नियुक्त पत्र प्रदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेसनात नवा कायदा आणणार, फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोलमाफी, आजपासून २१ जुलैपर्यंत सवलत लागू मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक, संबंधित मंत्र्यांमार्फत पाणीपुरवठ्याची माहिती देण्याचे बीएमसीच्या जलअभियंत्यांना निर्देश मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स, टीशर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत गाजला... कॉलेजने तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल, तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत पुण्यात आठ तालुक्यांतील पर्यटनस्थळ, गडकिल्ले, धबधब्यांवर जमावबंदी, भुशी डॅम परिसर, ताम्हिणी घाटातील दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


BSF Constables Missing: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल गायब, लास्ट लोकेशन परराज्यात, आईला वेगळाच संशय

Women Mysteriously Missing From BSF Academy: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. त्या गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. तर या प्रकरणी एका महिलेल्या आईने मोठी भीती व्यक्त केली आहे.


Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब

नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले.


Weather : सावधान! आज राज्यातील 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


Gondia Agriculture Department Raid | गोंदियात बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाची कारवाई

Gondia Agriculture Department Raid | Agriculture department action against bogus seed sellers in Gondia


रसायनांच्या पिंपातील पाणी पिण्याची वेळ!

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर या भागातून घातक रासायनिक उद्याोग हद्दपार करण्याची मोहीम सुरू करण्यात आली.