Trending:


Nandurbar News : नंदुरबारमध्ये दोन गटांत दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही फोडल्या

Nandurbar : नंदुरबार शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. नंदुरबार मधील इलाही चौक माळीवाडा आणि मच्छीबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे.


Suspicious Death In Dhule : एकाच कुटूंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

प्रवीण गिरासे (५२), पत्नी दीपांजली गिरासे (४७), मुलगे सोहम गिरासे (१८) आणि गितेश गिरासे (१४) अशी मृतांची नावे आहेत.


Suvarnadurg Fort | सुवर्णदुर्ग किल्ल्याला ‘युनेस्को’चे नामांकन

रत्नागिरी : मराठी आरमाराचा मानबिंदू असा उल्लेख ज्या किल्ल्याचा होता, त्या दापोली हर्णैजवळील समुद्रात असणार्‍या सुवर्णदुर्ग किल्ल्याची (Suvarnadurg Fort) नोंद जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी ‘युनेस्को’चे नामांकन (UNESCO nomination) प्राप्त झाले असून, राज्यातील एकूण अकरा किल्ल्यांचा यात समावेश आहे. यासाठी युनेस्कोची एक कमिटी ऑक्टोबरच...


Nitesh Rane vs NCP Special Report : Ajit Pawar यांच्या तंबीला चॅलेंजने उत्तर,राणे - पवार प्रकरण काय?

मुंबई : वाचाळवीरांनी थोडीशी मर्यादा पाळावी, कुठेही वेडंवाकडं विधानं करून मुख्यमंत्री वा घटकपक्षांना अडचणीत आणू नये असं सांगत अजित पवारांनी वाचाळविरांना दम दिल्यानंतर आता महायुतीतून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अजितदादांनी भाजपमधील वाचाळविरांची तक्रार दिल्लीतील वरिष्ठांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. तर अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंसारख्या भाजपच्या नेत्यांविरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. महायुतीत असूनही धर्मनिरपेक्ष राजकारण करणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत याबद्दल तीव्र नाराजी असल्याचं समजतंय. पण नितेश राणेंनी मात्र यावरून अजितदादांनाच चॅलेंज दिलंय. अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असं आमदार नितेश राणे म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नितेश राणेंची पाठराखण केल्याचं दिसतंय.


कोल्हापूर : जल्लोषी मिरवणुकीने बाप्पांना निरोप

कोल्हापूर : प्रशासनाने घातलेली बंदी झुगारून लेसर किरणांची उधळण करत, दिवसा पारंपरिक वाद्यांच्या, तर सायंकाळनंतर साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात, कोल्हापूरकरांच्या अमाप उत्साहात, प्रचंड जल्लोषात आणि तितक्याच चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी निघालेल्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीने लाडक्या बाप्पांना भक्तिभावे निरोप दिला. भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून गेल...


भारत-बांगला आमनेसामने

​भारत-बांगला आमनेसामने​


ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.


CBSE Pattern In Maharashtra: राज्यातील शाळांतही आता CBSE पॅटर्न; या 'कॉपी'ने पास होऊ?

CBSE Pattern In Maharashtra: ‘सीबीएसई’ आणि ‘एसएससी’ शाळांमधील विद्यार्थ्यांमधील हा सामाजिक फरक दुर्लक्षून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमांकडे पाहणे आवश्यक ठरते.


बीड : दहावीत शिकणारी मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती!

केज : पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुरूवारी (दि.१९) तिच्या मामाच्या मुलावर केज पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन...


Controversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोल

Controversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपचे पुढारी व त्यांच्या गोतावळ्यातील लोक करतात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा त्यावर बोलायला तयार नाहीत. म्हणजे या हिंसक वक्तव्यांना व गांधींवरील हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना मोदी-शहांचा छुपा पाठिंबा आहे असे समजायचे काय? महाराष्ट्रात राहुल गांधींवर हिंसक हल्ल्याची भाषा होते. गांधींवर हल्ला करणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा करणाऱ्यांना गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही. मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे! लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत भाजप व त्यांच्या गोतावळ्याने केलेली वक्तव्ये भयंकर आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे विष पेरले ते कसे उगवले आहे याचे चित्र मागच्या काही दिवसांत दिसले. आरक्षणासंदर्भात गांधी यांनी परदेशात केलेले विधान भाजपवाल्यांनी देशात मोडून तोडून समोर आणले. गांधी हे देशातील आरक्षण संपवायला निघाले आहेत व आम्ही ते होऊ देणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. 'फेक नरेटिव्ह' निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी, शहा व फडणवीस असे लोक आहेत व त्यांनी गांधी हे आरक्षणविरोधी असल्याचा प्रचार सुरू केला. इथपर्यंत सर्व ठीक, पण आता भाजप व त्यांच्या लोकांनी गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्ये करायला सुरुवात केली. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ, अशी भाषा मिंधे गटाच्या एका आमदाराने केली, तर भाजपचे एक 'बोंडे' खासदार सांगतात, जीभ कापण्याची गरज नाही. जिभेला चटके देऊ. त्याच वेळी दिल्लीतील भाजपचे एक आमदार धमकी देतात की, राहुल यांची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखी करू. ही धमकी म्हणजे गांधी यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती व राहुल गांधी यांनाही त्याच मार्गाने जावे लागेल, असे भाजपचे आमदार सांगतात. त्याच वेळी केंद्रातले रेल्वे राज्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री राहुल गांधींबाबत अभद्र आणि हिंसक वक्तव्ये करतात. हे चित्र बरे नाही. भाजपचे मानसिक संतुलन कोलमडले आहे व वरपासून खालच्या स्तरापर्यंत या कोलमडलेल्या मनाची प्रचीती लोकांना रोज येत आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत व त्यांच्या पक्षाचे शंभर खासदार निवडून आले आहेत. सरकारच्या खोट्या व चुकीच्या गोष्टींची गय न करता त्यांनी मोदी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. विरोधी पक्षनेत्याचे हे कर्तव्यच आहे व भारतीय संविधानाने त्यांना हा अधिकार बहाल केला आहे. विरोधी पक्षनेते संविधानाने दिलेल्या अधिकाराचे पालन करीत आहेत. त्यामुळे चिडलेला भाजप त्यांची जीभ कापणार असेल तर या देशात इदी अमिनशाही सुरू आहे हे मान्य करावे लागेल. गांधी यांनी आरक्षणाबाबत मत मांडले, ते चुकीच्या पद्धतीने समोर आणले गेले. त्याचा प्रतिवाद न करता जीभ कापण्याची व चटका देण्याची भाषा करायची हा कोणता कायदा? रशियात पुतीन यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ठार केले किंवा तुरुंगात टाकले. युगांडात इदी अमिनदेखील विरोधकांशी याच पद्धतीने वागत होता. भारतातील भाजप व त्यांच्या कोंडाळ्यानेही आता त्याच पद्धतीने वागायचे ठरवले आहे. प्रश्न राहुल गांधींचा नसून देशातील लोकशाही परंपरेचा आहे. देशातील आरक्षण संपवायचा अधिकार कुणा एका व्यक्तीला व त्याच्या पक्षाला नाही. दलित, शोषित, भटके, विमुक्त, आदिवासी, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना स्वाभिमानाने जगण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण दिले आहे. ते कुणाच्या बोलण्याने व भाषणाने कसे रद्द होणार? पण भाजपवाले खोटे बोलण्यात व फेक नरेटिव्ह निर्माण करण्यात वस्ताद आहेत. त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत व त्यासाठी ते संधी शोधत आहेत. मुख्य म्हणजे राहुल गांधी यांच्यासह मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले, पण त्या तुरुंगाचे भय आता उरलेले नाही. मोदी यांचेही भय संपले आहे. कारण या लोकांनी सर्वच बाबतीत अतिरेक केला आहे आणि आता ते हिंसक बोलण्याचा अतिरेक ते करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोदी यांचा तसा पराभवच केला. तरीही त्यांचे डोके भलत्याच दिशेने चालत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपचे पुढारी व त्यांच्या गोतावळ्यातील लोक करतात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा त्यावर बोलायला तयार नाहीत. म्हणजे या हिंसक वक्तव्यांना व गांधींवरील हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना मोदी-शहांचा छुपा पाठिंबा आहे असे समजायचे काय? महाराष्ट्रात राहुल गांधींवर हिंसक हल्ल्याची भाषा होते. गांधींवर हल्ला करणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा करणाऱ्यांना गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही. मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे!


Zero Hour Jammu Kashmir : जम्मू - काश्मीरमध्ये 370 वरुन घमासान, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी दोन ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काल किश्तवाडमध्ये दोन जवान शहीद झाले होते. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी येथील चक टापर भागात शुक्रवारी (13 सप्टेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली. आज सकाळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. किश्तवाडच्या चत्रू पट्ट्यातील नैदघम गावात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. नायब सुभेदार विपिन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत. कठुआमध्ये दोन दहशतवादी ठार, शस्त्रे जप्त याआधी कठुआच्या खंडारामध्येही लष्कराचे ऑपरेशन झाले होते. येथे रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने एक्सवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.11 सप्टेंबर रोजी उधमपूरमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. लष्कराने सांगितले की, लष्कराच्या फर्स्ट पॅरा सैनिकांना उधमपूरच्या खांद्रा टॉपच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुमारे चार तास चाललेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.


Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 08 PM 19 Sep 2024

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.


MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna

अहमदनगर : उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मी इथून संभाजीनगर ला जाणार असल्याचे सांगत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिर्डी येथील जुनी पेन्शन मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. राज्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना जुनी पेन्शन योजना (Old Pension Yojana) आणि नवी पेन्शन योजनेबाबत भाष्य केले. तसेच, आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच केलं आहे. शालेय शिक्षण सेवकांना आपण लाभ दिला असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असताना काही उपस्थितांनी मध्येच उभे राहून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, जुनी पेन्शनची मागणी करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला. येथील कार्यक्रमात पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना देखील मदत करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल.पगाराच्या रकमेपेक्षा खर्च जास्त असल्याने यातून मार्ग काढू. केंद्र सरकार ने जाहीर केलेली पेन्शन योजना सर्वांना माहीत आहे. मात्र,याबाबत सम्रभ पसरविला जातोय. काही लोक इथे भाषण करून गेले असतील, ते सत्तेत असताना काही देऊ शकले नाहीत. मात्र, एकनाथ शिंदे यांना जबाबदारी समजते. एक सामान्य रिक्षावाला या पदावर बसला आहे, असे म्हणत नाव न घेता शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केसरकरांनी हल्लाबोल केला.


Tirupati Prasad : तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये सापडली जनावरांची चरबी, एनडीडीबीचा अहवाल आला समोर

Tirupati Prasad News : आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भगवान तिरुपतीच्या प्रसादाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपावरून आंध्रमधील राजकारण चांगलेच तापलं आहे. अखेर आज गुजरातमधील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने केलेल्या प्रसादाच्या केलेल्या चाचणीतून प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे.


Fish market | मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची तुफान गर्दी !

मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची तुफान गर्दी !


Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार

Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार खेड तालुक्यातील भोस्ते घाटात सापडला एका पुरुषाचा सापळा, आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडली असतानाच आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना सांगितले आणि त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे. अशीच नोंद पोलिसांच्या एफआयआर मधे सुद्धा करण्यात आली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे १७ सप्टेंबर २०२४ रोजी योगेश पिंपळ आर्या (३०) ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगांव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे.’ योगेश आर्या च्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली असता भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास घेऊन अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून ५ फुटावर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ए आय आर कंपनीचे कळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमधे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसाना करावा लागणार आहे. मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असे असताना त्याची खबर स्थानिकांना न लागता थेट मृतदेहच सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची खबर स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात ही गोष्ट विचार करायला लावणारी, अचंबित करणारी आणि तितकीच खळबळजनक आहे. यातून आता कोणते गूढ खेड पोलीस उलगडतात याकडे खेड पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे.


रंगभूमीवरही महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा अंक

राज्यातील सत्तानाट्याचे पडसाद कलाक्षेत्रावरही पडताना दिसत आहेत. ‘मला काही सांगायचंय’ आणि ‘५० खोके एकदम ओके’ ही दोन नाटक रंगभूमीवर लवकरच दाखल होणार आहेत.


Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 Sept 2024

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.


Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागी

Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागी Bachchu Kadu on Mahayuti : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. आज पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आदी नेते उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी महायुतीमधून अप्रत्यक्षपणे बाहेर पडल्याचे सांगितले. तिसऱ्या आघाडीने परिवर्तन महाशक्ती असं नाव दिलं आहे. 26 सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे. स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली, असे म्हणत महायुतीला सोडचिट्टी दिल्याचे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उमेदवार देत बंडाळी केली होती.


Sharad Pawar | शरद पवार सोमवारी चिपळुणात येणार

चिपळूण शहर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या सोमवारी (दि. २३) चिपळूण दौऱ्यावर येणार असून, यावेळी बहादूरशेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या न.प.च्या स्वा. सावरकर मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. पाच वर्षांनंतर शरद पवार प्रथमच चिपळूण दौऱ्यावर येत असून, यावेळी ते समाजातील सर्व घटकांशी संवाद साधणा...


Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पहिली झलक, ताशी 350 किमी वेगाने स्वप्ननगरीकडे धावणार

Mumbai Ahmedabad Bullet Train: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या ड्रीम रूटवर धावणार आहे. या मार्गावर वेगाने काम सुरू आहे. ही ट्रेन बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी 508 किलोमीटर असून प्रकल्पाची एकूण किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे.


केजरीवाल यांची खेळी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या रविवारी आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून राजकीय वादळ निर्माण केले होते. मुख्यमंत्रिपद दोन दिवसांत सोडण्याचा निर्धारही व्यक्त करताना त्यानुसार ते पदावरून पायउतारही झाले. दिल्ली विधानसभेची मुदत फेब—ुवारी 2025 मध्ये संपत असली, ...


Jani Master : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफरला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक, पोलिसांची मोठी कारवाई

एका कोरिओग्राफरने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्या अडणी वाढल्या आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे.


Anil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in India

अमरावती : काँग्रेसनेत्या (Congress) आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर टीका करताना खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांची जीभ घसरली. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली, असं बोंडे म्हणाले. तसंच यांचा डीएनए हा इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा आहे, असंही ते म्हणाले. अनिल बोंडे म्हणाले, इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ठाकुरांची पदवी मिळाली. इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा यांचा डिएनए आहे. काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधीचा आहे. भाजपचा डीएनए हा भारताचा आहे.. दानधर्म केल्याने "ठाकुर" ही पदवी दिल्याचा भटांचा दावा यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडें यांना थेट भाटांकडील इतिहास दाखवून प्रतिउत्तर दिले आहे.1700 साली सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबांना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला "ठाकुर" ही पदवी दिल्याचा दावा यशोमती ठाकूर यांच्या घरी आलेल्या भाटांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर यशोमती ठाकूर म्हणाल्या, सन 1700 मध्ये सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबाना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला "ठाकुर" ही पदवी देण्यात आली आहे. दुष्काळात आमच्या पूर्वजांनी दान केले त्यांच्या नोंदी आहेत. माझ्या पूर्वजांनी गरीबांना मदत केली हा इतिहास आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दंगली झाल्या आहे.खासदार म्हणून त्यांना जे मूळ काम त्यांना करायचे आहेत ते करत नाही. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच आहे. नथुराम गोडसे यांनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं, आणि स्वतः महात्मा गांधीना मारायचा प्रयत्न केला. संघ आणि भाजप सतत करत असतात. गांधी त्या युगातला असो की या युगातला असो गांधी गांधी आहे. या देशाचा मूळ डीएनए गांधी आहे. कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतो.. जी काही विकृती आहे ती विकृती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यांमध्ये आहे. ती विकृती नष्ट झाली पाहिजे यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे असा आमचा अट्टाहास आहे, असे काही दिवसांपूर्वी यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.


EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवली

EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवली कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना कर्मचारी भविष्य निधीतून (ईपीएफ) मधून वैयक्तिक आर्थिक गरज भागविण्यासाठी एकावेळी पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख करण्याचा निर्णय केंद्रीय श्रम मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओच्या परिचालनासाठी अनेक नियमांत बदल करण्यात आले आहेत. ईपीएफओचे डिजिटल आर्किटेक्चर नूतनीकृत करण्यात आले आहे. सदस्यांना गैरसोय सोसावी लागू नये, यासाठी नियम अधिक लवचिक व प्रतिसादक्षम करण्यात आले आहे. विद्यमान नोकरीत ६ महिने पूर्ण न करणाऱ्या नवीन सदस्यांनाही आता ईपीएफमधून पैसे काढता येतील. आधी त्यांना ही परवानगी नव्हती.


Aaj Che Havaman (आजचे हवामान): राज्यात आज 'या' जिल्ह्यांत मुसळधार! IMD कडून यलो अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्याच्या दृष्टीने पुढचे दोन-तीन दिवस पावसाचे असणार आहे. त्यानुसार, आज कोकणात व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या तीन दिवसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागातर्फे काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस सक्रिय, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे.


Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 19 September 2024: ABP Majha

काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार अजित पवारांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा राष्ट्रवादीला संशय, आक्षेपार्ह मजकूर असलेलं पेज फॉलो झाल्याने संशय बळावला, मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, आज राज्यभर आंदोलनं, तर दोन्ही नेते आपआपल्या नेत्यांवर ठाम मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार... आज दुपारी ४ वाजता रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हातात घेणार भाजप अध्यक्ष नड्डांचं खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तर, राहुल गांधींनी ओबीसींना चोर म्हटलं, पंतप्रधानांना दांडुक्याने पिटू म्हटलं, त्याचं समर्थन कसं कराल, नड्डांचा सवाल भिवंडीतील विसर्जन मिरवणूक राड्यानंतर गृहखात्याची कारवाई, उपायुक्तांची तातडीने बदली, योग्य पद्धतीने परिस्थिती न हाताळल्याचा ठपका दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार... . वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ रेल्वे स्थानकाशेजारी ४० हजार घरांसाठी लॉटरी


Amit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चा

Amit Thackeray: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत.यामध्येच सोमवारी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची मुंबईतील राजगड कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पूत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आपल्याला लोकांसाठी जर काही करायचं असेल तर स्वतः संसदीय राजकारणात यायला हवं असं मनसे नेते आणि सरचिटणीस यांना सांगत मी देखील विधानसभेसाठी तयार आहे अशी तयारी दर्शवली. त्यामुळे आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात येणार या चर्चांना आणि त्यांनी यावं यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी होऊ लागलीये.


Lebanon Pager Blast Special Report : हल्ला डेंजर, फुटले पेजर...लेबनॉनमध्ये काय घडलं?

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या पेजरचे स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. ती घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर आज राजधानी बेरुतमध्ये दोन स्फोट झाले. हे स्फोट वॉकी टॉकीमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोशल मीडियावरील माहिती नुसार यावेळी लॅपटॉप, वॉकी टॉकी आणि मोबाईलमध्ये ब्लास्ट झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 100 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या वॉकी टॉकीमध्ये देशातील दक्षिण भागात आणि राजधानीच्या दक्षिणेतील उपनगरांमध्ये स्फोट झाले आहेत. रिपोर्टनुसार काल एक स्फोट झाला होता. त्या घटनेतील मृतांवर जिथं अंत्यसंस्कार करण्यात येणार होते त्या जागेजवळ वॉकी टॉकीचा स्फोट झाल्याची माहिती आहे. मंगळवारी झालेल्या पेजर स्फोटात 3 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती होती. तर, 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हदथ टीव्हीच्या रिपोर्टनुसार लेबनॉनमध्ये झालेल्या वॉकी टॉकी स्फोटात 100 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.


Thane News | अग्निशस्त्रांची अवैध वाहतूक करणारी टोळी गजाआड

भिवंडी : ठाणे पोलीस आयुक्तांनी ९ सप्टेंबर रोजी जारी केलेले मनाई आदेश झुगारण्यासह अवैधपणे अग्निशस्त्रांची मालेगावहून विक्रीच्या उद्देशाने भिवंडीत वाहतूक करणाऱ्या टोळीचा नारपोली पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. कारचालक जमील अन्सारी (३४ रा. दिघा, नवी मुंबई), टोळीतील म्होरक्या कासिम अहमद अन्सारी उर्फ राजवीर उर्फ प...


Kokan News | स्वायत्त कोकणासाठी आजपासून आंदोलन

रत्नागिरी : स्वायत्त कोकणासाठी गुरुवारपासून आंदोलन छेडले जाणार आहे. हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार असल्याची माहिती समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रशांत यादवराव यांनी दिली. ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वा. हातखंबा...


Aadhaar Card : आधार कार्ड क्रमांक 12 अंकी का असतो? तुम्हाला माहिती आहे का या मागील कारण, जाणून घ्या

Aadhaar Card : आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो. आधार कार्डशी अनेक गोष्टी संलग्न करण्यात आल्यानं त्याचं महत्त्व वाढलेलं आहे.


Minor Girls Gangrape In Pune : बारामतीतील अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार, तिघे अटकेत

आरोपींची मुलींशी ओळख होती. याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.


संविधानभान : विधिमंडळाचे विशेष अधिकार

विधिमंडळाचे विशेषाधिकार १९४ व्या अनुच्छेदामध्ये आहेत. त्यानुसार विधिमंडळाच्या सभागृहामध्ये भाषणस्वातंत्र्य आहे..


Crime News : एकतर्फी प्रेमातून विवाहितेला संपवले

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गौरी लणेश आरे (वय 25, रा. कळस माळवाडी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गौरी यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी (दि. 18) सकाळी साडेसात वाजता उपचारांदरम्यान गौरी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी विश्रांतवाडी प...


One Nation One Election: 'मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..', उल्हास बापट असं का म्हणाले?

Ulhas Bapat on PM Modi: 'वन नेशन वन इलेक्शन' या विषयावर बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती दर्शनासाठी दिलेल्या भेटीचा दाखला देत मार्मिक टिप्पणी केली आहे.


धर्माधिष्ठित मतपेढीची जुळवाजुळव

धर्म आणि शासन स्वतंत्र असावेत ही गोष्ट अमेरिकेतील कायद्याने तसेच सर्वसामान्य जनमतानेही अगदी हल्लीपर्यंत मान्य केली होती. मात्र आता निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक मुद्दे चर्चेस येण्यात सामान्य जनतेलाही काही वावगे वाटेनासे झाले आहे, ते का?


२०२९ मध्ये ‘एक देश एक निवडणूक’

कोविंद समितीच्या अहवालाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे.


Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.


Nashik Recruitment fraud | आरोग्य विभागात बोगस भरतीचा प्रयत्न उधळला

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती असल्याची बनावट जाहीरात सोशल मिडियाद्वारे पसरवून बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या सतर्कतेमुळे बुधवारी (दि. १८) टळला. सदर जाहीरात वाचून अनेक बेरोजगार महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जमा झाले होते. अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे महापालिक...