Ravindra waikar clean chit | आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी, संजय राऊतांची खोचक टीका ABP Majha
दुसरं काय होऊ शकतं, आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी आहे हे सरकार महाराष्ट्रातल असो की दिल्लीतल असो ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती हे दंडाची बेडकी फुगून दाखवत आहेत या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारा संदर्भात कारवाई करा, इडी, सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले यामध्ये वायकर सुद्धा आहेत, वायकर हे घाबरून पळून गेलेले आहेत वायकरांना आता क्लीन चीट दिली दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये, हे काय कायद्याचं राज्य आहे का याचा अर्थ असा तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले खोटे गुन्हे दाखल केले, त्यांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना आपल्या पक्षात घेतले हे तुम्ही मान्य करा आमच्या सह सर्वांवरती तुम्ही खोटे खटले खोटे गुन्हे दाखल केले, आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाहीत, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे तसे अनेक लोक पळून गेले अजित पवार, मुख्यमंत्री यांच्याकडील आमदार आमच्याकडील मंत्री भीतीपोटी पळून गेले त्यातीलच एक वायकर आहेत आमच्या वरचे सुद्धा गुन्हे मागे घ्या ना, नवाब मलिक यांच्यावरचे घ्या, प्रफुल पटेल वरचे घेतले 150 कोटींची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केलीत, आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जप्त केलेले आहे का तर आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून म्हणून आमच्यावर खटले दाखल केले याचा विचार करायला हवा सोमय्या काय सांगतात ते फडतूस माणूस आहे, त्यांनी आता बोलावं, जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील हे मी स्पष्ट बोलत आहे, सत्यवचनी असतील तर त्यांनी हे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घालून धुण्याचा काम सुरू आहे त्यावर बोलावं तुम्ही खरे असाल तर तुमचे रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल डुबलीकेट असाल तर तुम्ही यावर बोलणार नाही असे अनेक गुन्हे राजकीय दबावातून आणि गैरसमजातून त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं पोलीस आणि इओडब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतो? ई ओ डब्ल्यू च्या प्रमुखांवर खटला दाखल केला पाहिजे आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत ज्यांनी गैरसमजातून गुन्हे दाखल केले जो मनस्ताप दिलेला आहे वायकरांना त्यांना आमच्या शिवसेनेतून पळून जायला भाग पाडले त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा माझं फडणवीस यांना आवाहन आहे ऑन काँग्रेस 288 उमेदवारी अर्ज कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली, प्रमुख विषयांवर चर्चा झाली आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत, सर्वांनी 288 जागेवर लढण्याची तयारी केलेली आहे, कोणता मतदार संघ कोणाच्या वाटेला येईल हे अद्याप ठरायचं आहे ऑन मुख्यमंत्री विकेट तुमचा स्टंट लक्षात राहिलेला आहे, तुमची आता क्लीनबोल्ड ची वेळ आलेली आहे तोही क्षण लक्षात ठेवा, तुमचे तिन्ही स्टंप फडणवीस,अजित पवार आणि मिंदे हे तिन्ही स्टंप मुंबई - संजय राऊत यांची पत्रकार परिषद दुसर का होऊ शकते आता फक्त दाऊदलाच क्लीनचीट द्यायच बाकी आहे ओवाळून टाकलेले सर्व नेते या पक्षात घेतले जातात वायकर हे घाबरून पळून गेले आता त्यांना क्लीनचीट दिली याचा अर्थ तुम्ही आमच्या पक्षातील लोकांनावर खोटे गुन्हे दाखल केले हे मान्य करा आम्ही या दबावाला बळी पडलो नाही भाजपने मान्य केले पाहिजे की खोटे गुन्हे दाखल केले होते आमच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्या नवाब मिकांवरचे देखील गुन्हे मागे घ्याव जर तुम्ही खरे असाल तर सांगा हे खोटे खटले दाखल केले होते
2024-07-06T11:45:40Z
ABP Majha Headlines : 12:00 PM : 6 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12:00 PM : 6 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..
2024-07-06T06:59:52Z