ULHASNAGAR CRIME NEWS : वाढदिवसालाच मित्रांनी घेतला जीव, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बर्थ डे पार्टीमध्ये मित्रांमध्ये दारुच्या कारणावरुन वाद झाला. हळुहळू हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले. रागाच्या भरात मित्रांनी बर्थडे बॉयला चौथ्या मजल्यावरुन ढकललं. त्यामुळे त्या तरुणाचा जीव गेल्याची माहिती मिळाली आहे. (Ulhasnagar News)

वाढदिवसालाच तरुणाचा जीव गेल्यानं उल्हासनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उल्हासनगरच्या चिंचपाडा भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. (Crime News)

वाढदिवसाच्या पार्टीत खूपदा भयानक प्रकार घडत असतात. पण उल्हासनगरमध्ये चिंचपाडा भागात मित्रांनी वाढदिवसालाच बर्थ डे बॉयचा जीव घेतल्याने शोक व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना अटक केली आहे. कार्तिक वायाळ असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कार्तिकचा 27 जूनला वाढदिवस होता. दुर्दैवाने तोच त्याच्या मृत्यूचा दिवस ठरला. (Murder In Ulhasnagar)

कार्तिक वायाळच्या वाढदिवसानिमित्त त्याचे मित्र मित्र सागर काळे, निलेश क्षीरसागर,आणि धीरज यादव यांनी त्याला पार्टी देण्याचा प्लॅन केला. चिंचपाडा गावामधील आर्या अपार्टमेंटमध्ये ही पार्टी सुरु होती. आर्या अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर निलेशचा फ्लॅट होता. तिथे कार्तिकची बर्थ डे पार्टी सुरु होती. मात्र अचानक या पार्टीत दारूवरून मित्रांनी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. कार्तिकने भांडताना निलेशच्या डोक्यात बाटली फोडली. त्यामुळे निलेशसोबत सागर आणि धीरजने मिळून कार्तिकला चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं. त्यामुळे कार्तिकचा मृत्यू झाला. (Birthday Boy Killed By His Friends In Ulhasnagar)

दरम्यान कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारली. त्यामुळे जखमी निलेशला आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो. परत आलो तेव्हा कार्तिकचा मृत्यू झाला होता, असा बनावर रचण्याचा या मित्रांनी प्रयत्न केला. मात्र कार्तिकच्या वडिलांना तिघांवर संशय होता. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिघांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी कार्तिकच्या तिन्ही मित्रांना अटक झाली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे. कार्तिकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

2024-07-02T15:06:51Z dg43tfdfdgfd