बातम्या

Trending:


Water Level In Dams: धरणक्षेत्रांत थेंबे थेंबेच... पाणीसाठ्यात अवघी दीड टक्का वाढ; कोणत्या धरणात किती पाणी?

Mumbai Dams Water Level: जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात महापालिका मागे घेऊ शकते.


Navi Mumbai: मोरबे धरणग्रस्त आक्रमक; नवी मुंबईचे पाणी रोखणार, पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा

Navi Mumbai water supply: नवी मुंबईला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या मोरबे धरणातील पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे. इतकेच नाही तर पाण्याचे पाईप आणि कनेक्शन तोडण्याचा इशारा सुद्धा धरणग्रस्तांनी दिला आहे.


Zero Hour Guest Ambadas Danve : दानवेंचं गोऱ्हेंना पत्र, निलंबन मागे की कालावधी कमी करणार?

भेटी, बैठकांच्या बातमीनंतर.. आता पुन्हा जावूया विधिमंडळाच्या अधिवेशनात... आज चर्चा रंगली आहे ती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाची.. परवा, म्हणजेच १ जुलै रोजी आक्रमक भूमिका मांडताना दानवेंनी, सभागृहातच भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती.. त्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी, दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबनदेखील केलं.. यावर दानवेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी, महिलांची जाहीर माफी मागितली.. त्यानंतर दानवे यांनी एक पाऊल मागे घेत, याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.. त्याबाबत बोलण्यासाठी थोड्याच वेळात स्वत: अंबादास दानवे झीरो अवरमध्ये उपस्थित असणार आहेत... निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती करणारे पत्र, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेंंना त्यांनी दिलंय.. यावर दुपारी डॉ. निलम गोऱ्हेंंच्या दालनात बैठकदेखील पार पडली.. दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो.. याबाबतचा निर्णय झाला असून, उद्या संसदीय कार्यमंत्री त्या निर्णयाची घोषणा करतील.. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत दिली...


Weather update : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; पुढील 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाच्या रुपानं मोठं संकट देखील समोर आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.


Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial Report

नागपुरात झालेल्या आंदोलनाबाबत आता एक नवी माहिती समोर आलीय. या आंदोलनात नागपूरच्या बाहेरच्यांचा काही सहभागी होता का असा संशय उत्पन्न झालाय. स्मारक समितीने सुरू केलेल्या सौदर्यकरण प्रकल्पाला अचानक विरोध कसा काय सुरू झाला, इथपासून कालच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. या संदर्भात एबीपी माझाने थेट स्मारक समिती विश्वस्तांशी चर्चा केली... त्यातून कोणती माहिती समोर आलीय. पाहूया हा रिपोर्ट देशातलंच नाही तर जगातलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान... या ऐतिहासिक भूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा अंकूर पेरला, त्याचा आता जगभरात वटवृक्ष झालाय. मात्र इथल्या सौंदर्यीकरण प्रकल्पातील अंडरग्राऊंड कामाला विरोध करत १ जुलैला आंदोलन पेटलं. अंडरग्राऊंड सुरु असलेल्या विरोधाची कारणं जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने स्मारक समितीच्या विश्वस्तांशी चर्चा केली. त्यांनी दिलेली माहितीही या प्रकरणात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.


मुंबई पदवीधरसाठी अनिल परब रिंगणात


Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक, शिंदे सरकारला कोंडित पकडणार?

Marathi News Live Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.


Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report

सध्या विधानपरिषद निवडणुकीची जोरदार चर्चा रंगलीय... कुणी कुणाला उमेदवारी दिली याची चर्चा तर रंगली आहेच... मात्र त्याचसोबत, कोणत्या उमेदवाराची किती संपत्ती आहे... आणि उमेदवारांनी संपत्तीच्या बाबतीत कशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलीयत... पाहूयात... पंकजा मुंडेंची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- शेती, माजी आमदार निवृत्तीवेतन, भाडे बँक खात्यांत- ९१ लाख २३ हजार ८६१ शेअर्स, म्युच्युअल फंड- १ कोटी २८ लाख, ७५ हजार ६९४ स्वत:च्या नावावर एकही वाहन नाही स्थावर मालमत्ता- ९६ लाख, ७३ हजार, ४९० जंगम मालमत्ता- ६ कोटी ८ लाख, १५ हजार, ७०९ एकूण कर्ज- २ कोटी, ५० लाख, ३२ हजार ४२७ सोने- ४५० ग्रॅम (३२ लाख, ८५ हजार) ------------------- मिलिंद नार्वेकरांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- ७४ लाख १३ हजार, २४३ बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ३ लाख ६८ हजार, ७२९ स्वत:च्या नावावर एकही कोणतेही वाहन नाही सोने- ३५५ ग्रॅम (२४ लाख, ६७ हजार ९८१) जमीन- दापोली येथे ७४ एकर जमीन मालाड, बोरीवली १ हजार चौरस फुटाचं घर एकूण कर्ज- २६ लाख, ३८ हजार, १६० रुपये --------------- भावना गवळी यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न बँक खात्यांत- २१ लाख २५ हजार ०१६ रुपये बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- २७ हजार ७०० हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- २० लाख वाहन - टोयाटो इनोव्हा- २४ लाख ३७ हजार रुपये सोने- २०० ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) जमीन- रिसोड येथे ५ एकर ५६ गुंठे जमीन वाशिममध्ये ५ हजार चौरस फुटाचं घर ------------------- सदाभाऊ खोत यांची संपत्ती बँक खात्यांत- २ लाख ०८ हजार ८४० बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५३ हजार रुपये पोस्ट, पॉलिसीमध्ये- ५८ लाख ९ हजार ५०० वाहन - टोयाटो इनोव्हा क्रिस्ट- २९ लाख रुपये एमजी हेक्टर झेड एस इव्ही किंमत २३ लाख सोने- १५ ग्रॅम (१३ लाख ६० हजार ) सांगली ६१२ चौरस फुटांचं घर


Password Safety: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

Password Safety negligence : 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षितपणे पासवर्ड जतन करतात, सर्वेक्षणात धक्कादायक सत्य उघड झाले: भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती बाळगतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, 17 टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन

राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक -------------------- काँग्रेस, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन ------------------ पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांची धरपकड नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले.


Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय... सर्वच पक्षांकडून मतांची बेगमी करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. त्यातच, पुरेशी संख्याबळ नसताना उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलंय... त्यामुळे मोठी चुरस निर्माण झालीय... पाहूयात... मिलिंद नार्वेकरांचा प्रवास मिलिंद नार्वेकर उद्धवठाकरे यांचे अत्यंतजवळचे १९९२ साली गटप्रमुखअसताना नार्वेकरपहिल्यांदा मातोश्रीवर नार्वेकरांची कामाचीपद्धत पाहून ठाकरेंनीत्यांना जवळ केलं उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी,दौऱ्यांचं नियोजननार्वेकरांकडे अनेक नेत्यांचेशिवसेना सोडतानामिलिंद नार्वेकरांवर आरोप शिंदेंच्या बंडावेळी आमदारपरत आणण्याची जबाबदारीनार्वेकरांवर मिलिंद नार्वेकर यांचेभाजप, शिंदेसेनेसहसर्वच पक्षात चांगले संबंध शिवसेनेच्या फुटीनंतर मिलिंद नार्वेकर हे शिंदेंसोबत जाण्याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या... त्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांची विधानपरिषदेची उमेदवारी चर्चेचा विषय ठरलीय. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी गणितं नेमकी कशी जुळवली जातात, हे बघावं लागेल.


नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेची साईट उपलब्ध नाही


Pandharpur Wari Toll Free: पंढरीची वारी टोलमुक्त ! 21 जुलैपर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी जाहीर

Ashadhi wari toll free for warkari vehicles: आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफी करण्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


BSF Constables Missing: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल गायब, लास्ट लोकेशन परराज्यात, आईला वेगळाच संशय

Women Mysteriously Missing From BSF Academy: बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. त्या गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. तर या प्रकरणी एका महिलेल्या आईने मोठी भीती व्यक्त केली आहे.


Arvind Kejriwal | मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या अडचणीत वाढ

CBI Arrest Delhi CM Arvind Kejriwal


Rahul Gandhi | राहुल गांधी विठुरायाच्या दर्शनासाठी येणार

Rahul Gandhi To Visit Pandharpur For Vitthal Rukmini Darshan


Husband Killed Wife: व्हिडिओ कॉल जीवावर बेतला, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलं

Nagpur Crime: आरोपी विकी विर्क आणि मयत मन्नत कौर यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता आणि दोघांना 2 वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र विकीला जुगाराचे सवय जडली. त्यात तो मन्नतच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत मन्नत ही विकीपासून दूर तिच्या माहेरी राहत होती.


Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी

UP Hathras Stampede Tragedy: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हाथरस (Hathras Tragedy) येथे सत्संगच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 121 वर पोहोचला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हाथरस येथील रतिभानपूर गावात ही घटना घडली. हाथरसमधील एका गावात साकार विश्व हरी भोले बाबा यांचं सत्संग आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजारो अनुयायी उपस्थित होते. सत्संगदरम्यान या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी चेंगराचेंगरी झाली, जमलेले लोक एकमेकांना तुडवत होते. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढणार आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये काल झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा १२१वर पोहोचला आहे, यामध्ये ११२ महिला आणि ७ लहान मुलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, भोलेबाबाच्या ज्या सहकाऱ्यानं हा सस्तंग आयोजित केला होता, त्या देवप्रकाश मधुकरवर आज अनेक गुन्हे दाखल केले. मात्र भोलेबाबा उर्फ सूरजपाल सिंहवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सत्संग संपल्यावर भोलेबाबा आपल्या कारकडे जात असताना त्यांची चरणधूळ जमा करण्यासाठी अनेक भाविक धावले, आणि नेमकं हेच कृत्य चेंगराचेंगरीचं कारण ठरलं असं तपासात समोर आलं आहे.


SSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी, कर्मचारी निवड आयोगात ८ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती

Staff Selection Commission Recruitment: कर्मचारी निवड आयोगात एकूण ८ हजार ३२६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात आवश्यक माहिती जाणून घेऊयात.


IndiGo flight News: मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशानं हद्दच केली, टॉयलेटमध्ये गेला अन्…

Delhi-Mumbai IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


‘दीक्षाभूमी’चा प्रक्षोभ

Deekshabhoomi Nagpur : दीक्षाभूमी स्मारक समितीने संवादी भूमिका टाळल्याने आणि एकूणच पारदर्शकता न दाखविल्याने हा तिढा चिघळल्याचा अनेकांचा आरोप आहे.


Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha

Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha हेही वाचा BOB Jobs 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, 600 हून अधिक पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या Bank of Baroda Jobs 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांवर भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदांवर भरती बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 627 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.