PM NARENDRA MODI INTERVIEW: तानाशाह, हिटलर आणि पुतिन बाबाच्या आरोपांवर पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर पलटवार

PM Narendra Modi Exclusive Interview: लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. दोन्हीकडून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. तसेच सत्ता आपलीच येणार असाही दावा दोन्ही बाजुंनी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टाइम्स नाऊला विशेष मुलाखत दिली आहे. टाइम्स नाऊ आणि टाइम्स नाऊ नवभारतच्या ग्रुप एडिटर एन चीफ नाविका कुमार (Navika Kumar) आणि टाइम्स नाऊ नवभारतचे सल्लागार संपादक सुशांत सिन्हा (Sushant Sinha) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून हिटलर म्हणून टीका करण्यात येत असते. विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्ही हुकूमशहा आहात, पुतिन बाबा आहात अशा प्रकारे विविध आरोप विरोधकांकडून करण्यात येतात. भविष्यात निवडणुका होणार नाहीत, नियम, कायदे बदलले जातील असे म्हटले जाते इतकेच नाही तर तुम्ही अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या सारख्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात टाकले आहे विरोधकांच्या या आरोपांकडे कसे पाहता? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, तुम्ही विषय खूप चांगला मांडला आहे. माझ्याकडे यासंदर्भात उत्तर आहे. पण ममी तुम्हाला विनंती करेन कारण, टाइम्स नाऊची एक आपली प्रतिष्ठा आहे. या विषयाचे शास्त्रीय विश्लेषण करता येईल का? जसं तुम्ही 'न्यूज की पाठशाला' नावाचा शो करता. आता काँग्रेस, भाजप लिहा आणि कोणते काम त्यांनी केले आणि कोणते काम आम्ही केले त्यासंदर्भात टिक मार्क करा. मोदींच्या पूर्वी जे नेता होते त्यांनी काय-काय केले टिक मार्क करा. त्यांच्या पणजोबांनी काय केले, टिक मार्क करा.नेहरूजींनी पहिली दुरुस्ती कोणती केली होती? संविधानावर टिक मार्क करा. आणीबाणीच्या काळात अधिक पत्रकार तुरुंगातून कविता लिहित होते.. टिक मार्क करा. तुमचे गाणे आवडले नाही आता मजूर सुलतान पुरीजींना कारागृहात टाका. किशोर कुमार यांची गाणी बंद केली. विरोधी पक्षनेते कारागृहात होते, किती लोक कारागृहात होते आणि किती दिवस होते? काय कारण होते? या सर्वांची आकडेमोड करावी आणि आमच्या सरकारच्या कार्यकाळाचा हिशेब करावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटलं, नौदलाच्या जहाजांमध्ये पिकनीक करत होते. त्यावेळी कोणती लोकशाही होती सांगावं? मनमानी करुन अनेकांची घरे पाडली, नागरिकांची नसबंदी केली. ही कोणत्या प्रकारची कारवाई होती. त्यांनी गायत्री देवींवर कशा प्रकारचे अत्याचार केले होते? कलम 356 चा 100 वेळा दुरुपयोग केला गेला. हे सर्व प्रश्न तुम्ही आपल्या हिशोबाने काढा आणि टिक मार्क करा. मला विश्वास आहे की तुमचा 'न्यूज की पाठशाला' शो आठवडाभर चालेल.

माझा विश्वास आहे की, 100 पैकी एका टप्प्यावर तुमच्याकडे कुठेतरी एक टप्पा येईल आणि हे आरोप करत असलेल्या गोष्टींवर तुमचा विश्वास बसणार नाही. आपण सर्वजण, हे शहर, याचे कारण म्हणजे आपण पूर्णपणे लोकशाहीवादी आहोत. आपल्या शिरपेचात लोकशाही आहे. भारतात संपूर्ण बहुमत असलेली आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. 10 वर्षे चालवलेले निष्कलंक सरकार, 13 - 13 वर्षे राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहिले. 23 वर्षांच्या कार्यकाळात कलंकित नाही. लोकशाहीचा यापेक्षा मोठा पुरावा आणखी कोणता असू शकतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

2024-05-07T00:57:33Z dg43tfdfdgfd