MAHARASHTRA PHASE 2 VOTING PERCENTAGE: महाराष्ट्रात टक्का घसरला, उमेदवारांमध्ये धाकधूक; 5 वाजेपर्यंत 53.51 टक्के मतदान

Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting Percentage: देशात लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. शुक्रवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. देशात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60.7% मतदान झाले आहे, तर महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत लोकसभेच्या 8 जागांवर 53.51% मतदान झाले आहे. देशातील 543 जागांसाठी 7 टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 21 राज्यांतील 102 जागांसाठी मतदान घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात देशभरात सुमारे 65.5% मतदान झाले होते, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मात्र महाराष्ट्रात मतांचा टक्का उमेदवारांची धाकधूक वाढवणारा आहे.

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा या मतदारसंघात मतदान झाले, तर पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या पाच मतदारसंघात मतदान झाले आहे. यानंतर आता पुढील तीन टप्प्यात राज्यातील उर्वरित 35 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्रात मतांचा टक्का घसरला, उमेदवारांमध्ये धाकधूक

बुलढाणा - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.24% मतदान (2019 मध्ये 57%)

अकोला - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.49% मतदान (2019 मध्ये 64.2%)

अमरावती - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.5% मतदान (2019 मध्ये 63.8%)

वर्धा - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56.66% मतदान (2019 मध्ये 64.2%)

यवतमाळ-वाशिम - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.05% मतदान (2019 मध्ये 61.31%)

हिंगोली - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.03% मतदान (2019 मध्ये 70%)

नांदेड - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.47% मतदान (2019 मध्ये 69.05%)

परभणी - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.79% मतदान (2019 मध्ये 66.10%)

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती मतदान?

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 60.7% मतदान झाले. मणिपूर, छत्तीसगड, बंगाल, आसाम आणि त्रिपुरामध्ये 70% पेक्षा जास्त मतदान झाले, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. सांयकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 52.6%, बिहारमध्ये 53% आणि महाराष्ट्रात 53.5% नोंदवले गेले. छत्तीसगड 72.13%, मणिपूर 76.06%, आणि त्रिपुरामध्ये त्रिपुराामध्ये सर्वाधिक 76.23% मतदान झाले.

  • आसाम: 70.66%
  • बिहार: 53.03%
  • छत्तीसगढ: 72.13%
  • जम्मू-कश्मीर: 67.22%
  • कर्नाटक: 63.90%
  • केरळ: 63.97%
  • मध्य प्रदेश: 54.42%
  • महाराष्ट्र: 53.51%
  • मणिपूर: 76.06%
  • राजस्थान: 59.19%
  • त्रिपुरा: 76.23%
  • उत्तर प्रदेश: 52.64%
  • पश्चिम बंगाल: 71.84%

दुसऱ्या टप्प्यात या 88 जागांवर झाले मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20 जागा, कर्नाटकातील 28 जागांपैकी 14, राजस्थानमधील 13 जागा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8 जागा, मध्य प्रदेशातील 7 जागा, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 आणि मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका जागेवर आज मतदान झाले.

2024-04-26T14:44:44Z dg43tfdfdgfd