Trending:


Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली

Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे सुरक्षेच्या कारणास्तव NDRFचं पथक आळंदीत दाखल, कोणताही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी.संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह . अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे


Traffic Police | पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून जळण्याचा प्रयत्न

Wadettiwar Reaction on Pune attempt to fire on Traffic Police


अजितदादांच्या जुन्या सहकाऱ्याला विधानसभेची इच्छा, दत्तामामांसमोर दुहेरी संकट

इंदापूर विधानसभा मतदारसंघ.. बारामती इतकीच या मतदारसंघावर अजित पवारांचीही पकड आहे. अजितदादा ठरवतील तोच उमेदवार आणि आमदार.. असं समीकरण मागील दोन निवडणुकीत दुसून आलं.. राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर दत्ता मामांनी अजितदादांचं पारडं जड केल्यानंतर इंदापुरात बदल घडवण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न सुरू केलेत. तर राष्ट्रवादीतही आमदारकीसाठी रस्सीखेच पाहायला मिळतेय. अजितदादांच्या सहकाऱ्याने दत्ता मामांच्या जागेवर कसा दावा केलाय, आणि लोकसभेला इंदापुरात लीड न देऊ शकलेल्या दत्ता मामांना पुन्हा तिकीट मिळणार का, तेच सविस्तर पाहू.


Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...


Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive

Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात (Pune News) नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता संपूर्ण राज्याला पडलाय. पुण्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) पुन्हा एकदा हादरला आहे. पुण्यात महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण पुणेच नव्हेतर अवघा महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे. आरोपी संजय फकिरा साळवे (राहणार : पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना)) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


bihar bridge collapses : पडझडीचे वर्तमान

bihar ten bridges collapsed : बिहारमध्ये १५ दिवसांत एक, दोन नव्हे, तब्बल १० पूल कोसळले आहेत. पूल कोसळण्याच्या या दहा दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासा; पण, त्यामुळे कदाचित त्याचे गांभीर्यही अद्याप फारसे अधोरेखित झालेले नसेल.


Book Review : जगाचे पोट भरणारा शास्त्रज्ञ

leon hesser biography : खराब रस्ते, कृषी संशोधन केंद्रेही तशीच, अशा विपरीत परिस्थितीत बोरलॉग यांनी कृषिसंशोधन कसे केले? अन्नधान्य उत्पादन कसे वाढवले? त्यासाठी काय-काय प्रयत्न त्यांना करावे लागले? या सगळ्याचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


बुद्धीचा तो लोप

स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वयाच्या साधारण ५७व्या वर्षानंतर असते. अलीकडे मात्र हा आकडा ‘वर’ आला आहे. अगदी तरुण मुलांना, लहान मुलांनाही विस्मरण होण्याच्या घटना बघायला मिळतात. कमी वयात साध्या-साध्या गोष्टी सहजपणे विसरणे अनेक संशोधनातून आढळून आलेले आहे. हे इंटरनेटच्या अतिवापरामुळे घडते आहे का?


Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha


NEET-UG Counselings Postponed : NEET-UG परीक्षेचे समुपदेशन स्थगित, सर्वोच्च न्यायालयात ८ जुलैला होणार सुनावणी

NEET-UG Counselings Postponed : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG समुपदेशन पुढे ढकलले आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.


गांधी कुटुंबातला पहिला वारकरी!

संतोष गोरे, प्रतिनिधीलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणार आहेत. राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. शरद पवारांनी दिलेलं निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं. मात्र आता जोरदार राजकारण सुरू झालं आहे. शरद पवारांना हा अधिकार कुणी दिला? असा सवाल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी उपस्थित केला आहे. तर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, पालखी सोहळ्यात कॅटवॉक करण्यापेक्षा...


Tuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हार

Tuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हार तुळजाभवानी देवीला घातला चॉकलेटचा हार - चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार पुजाऱ्याने मंदीर संस्थांच्या परवानगी विना घातला देवीला तुळजाभवानी मंदीर संस्थानला देऊन कवायत कायदा लागु असताना त्याची अमलबजावणी केली जात नसल्याचा पुजाऱ्याचा आरोप देवीच्या गाभाऱ्यात केवळ फुलांचे हार व फळांनी सजवला जातो गाभारा - ऐतिहासिक ठेवा असताना तो तसाच राहावा पुजारी मंडळाने व्यक्त केली भुमीका चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता -चुकीची पध्दत नको - जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची मागणी हेही वाचा : रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


Nana Patole Full PC : भ्रष्ट लोकांचे सरदार नरेंद्र मोदी ; नाना पटोलेंची तिखट टीका

Nana Patole Full PC : भ्रष्ट लोकांचे सरदार नरेंद्र मोदी ; नाना पटोलेंची तिखट टीका पक्ष संघटनेत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक काम असले पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे, त्या अनुषंगाने राज्यात 288 जागेवर आम्ही उमेदवारांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा मेरीटच्या आधारावर काँग्रेसला (Congress) सुटतील त्या त्या जागेवर आम्ही आमचा उमेदवार उभा करू. त्यामुळे पक्षाची तयारी करणं यात काही गैर नाही आणि त्यामुळे याचा कुठेही चुकीचा अर्थ लावू नये. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्षांनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. असे असले तरी आम्ही सर्व एकसाथ एका विचाराने पुढे जात आहोत. आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीच्याच नावाने आम्ही लढणार आहोत. या चाचपणी संदर्भातील अर्थाचा अनर्थ कुणीही करू नये. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या तयारीवर स्पष्टोक्ती दिली आहे. आज नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.


पुणे Porsche कार अपघात प्रकरणातील आरोपीचा निबंध आला समोर, नेमकं काय म्हणाला?

पुणे, प्रतिनिधी : पुण्यात 19 मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडलं. कल्याणीनगर परिसरात झालेल्या या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही अलिशान कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं, अपघात घडल्यानंतर तिथे असल्येल्या नागरिकांकडून या मुलाला मारहाण देखील करण्यात आली. मुलगा अल्पवयीनं असल्यानं हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे...


Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू

Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बातमी अपडेट होत राहील हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


Maharashtra News : महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य

Maharashtra News : Maharashtra got best Agriculture state award


Majha Vitthal Majhi Wari : माऊलींच्या पादुकांचं निरास्नान; दौंडवासियांकडून अन्नदानाची सोय

Majha Vitthal Majhi Wari : माऊलींच्या पादुकांचं निरास्नान; दौंडवासियांकडून अन्नदानाची सोय माऊली महाराजांची पालखी आज सकाळी वाल्हे वरून निघाली आणि आजचा मुक्काम हा लोणंद मध्ये असणार आहे.. नीरा स्नानाला जाण्यापूर्वी माऊली महाराजांची पालखी ही पालखी तळावर ठेवण्यात आली त्यावेळी मीरा पंचक्रोशीतील लोकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.. सकाळपासून लोक पादुकांच्या दर्शनासाठी रांगेत उभा होते.. याच पालखीतळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी हेही वाचा : रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 6 July 2024 : ABP MAJHA

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 6 July 2024 : ABP MAJHA रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


Manoj Jarange Rally : मनोज जरांगेंची आजपासून 13 जुलैपर्यंत शांतता रॅली

आज सकाळी मनोज जरांगे पाटील हिंगोलीतील शांतता जनजागृती रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह अंतरवलीहून हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. साधारणतः सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील. बळसोंड येथे सकाळी साडेदहाच्या आसपास क्रेनच्या साहाय्यानं 30 फुटांच्या गुलाबाच्या फुलांच्या हरानं त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होईल आणि दुपारी 3 वाजता या शांतता रॅलीचा समारोप होईल. रॅलीचा समारोप मनोज जरांगे यांच्या भाषणानं होईल. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषदही घेणार आहेत.


Matoshree Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या निवासस्थान मातोश्री परिसरात आढळला साप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Matoshree Bungalow Snake Found : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या परिसरात साप आढळल्याने एकच खळबळ उडाली.


Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब

नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले.


Ravikant Tupkar | तुपकर काय भूमिका घेणार?

Ravikant Tupkar Today decide political decision


Vidhan Sabha Election : 'विधानसभेसाठी मला अनेक पक्षातून संपर्क, पण...'; अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंचं ठरलं!

पुणे : मला अनेक पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे ही फोन येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) कोणत्या चिन्हावर लढायची हे माझं ठरलेलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Camp) आमदार अण्णा बनसोडेंनी (Anna Bansode) केले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निकालानंतर (Lok Sabha Election 2024) बनसोडे हे महायुतीतून विधानसभा लढणार नाहीत? अशी चर्चा रंगलेली आहे. भाजपने अमित गोरखेंना...


Bullet Train Route Video: बोगदे, नद्या अन् पूल; पाहा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लाईनचा थक्क करणारा व्हिडिओ

Ahmedabad-Mumbai Bullet Train Route Video: बुलेट ट्रेनने अहमदाबाद ते मुंबई दरम्यानचा प्रवास 2 तास 7 मिनिटांत पूर्ण होईल. सध्या या दोन शहरांमधील प्रवासासाठी बसने 9 तास आणि ट्रेनने 6 तास लागतात. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.


Mumbai Flyover Slab Collapses: मुंबईतील अंधेरी भागातली धक्कादायक घटना उड्डाणपुलाचा कोसळला स्लॅब

Mumbai Flyover Slab Collapses: अंधेरीत वेस्टर्न हायवे मेट्रो स्थानकाजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली आहे. स्लॅब कारच्या बोनेटवर पडल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र कारचे अतोनात नुकसान झाले आहे. मुंबईतल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


Weather update : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; पुढील 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाच्या रुपानं मोठं संकट देखील समोर आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.


Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायलयाअंतर्गत नोकरीची संधी; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Bombay High Court Recruitment : नोकरी शोधताय? मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये महाव्यवस्थापक या पदांची जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करण्याचा ९ जुलै हा शेवटचा दिवस आहे.