Arvind Kejriwal Interim Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद कोजरीवाल यांच्या जामिनावर आज निर्णय होऊ शकला नाही. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्ट गुरुवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले.
केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करणे ही विलक्षण परिस्थिती आहे, सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत,असे त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. ते याआधी कोणत्याही गुन्ह्यात त्यांचा सहभाग आढळून आलेला नाही. ते काही अट्टल गुन्हेगार नाहीत. केजरीवाल हे 12 मार्चपासून कोठडीत असून दिल्ली मद्यविक्री धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात आहेत.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने आम आदमी पक्षाच्या अर्जावर सुनावणी केली. यापूर्वी 3 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने लोकसभा निवडणुकीचा माहोल पाहता केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याचे संकेत दिले होते. जामीन अर्जावर सुनावणी करण्यास तयार आहोत पण आवश्यकता भासल्यास दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीनही मिळू शकतो असे सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. कोर्टाने ईडीच्या प्रश्नांच्या उत्तराची तयारी करून येण्यास केजरीवाल यांना सांगितले.
या प्रकरणात हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचे रोखीचे व्यवहार झाल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले. त्यावर न्यायालयाने एएसजी राजू यांना विचारले की, 100 कोटींची लाच दोन वर्षांत 1100 कोटींची कशी झाली? यातून दारू कंपन्यांना 900 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे राजू म्हणाले. न्यायालयाने सांगितले की, ही संपूर्ण रक्कम गुन्ह्यातील रक्कम कशी बनली?
यावर राजू यांनी सविस्तर सांगितला संपूर्ण घटनाक्रम
वस्तुस्थितीनुसार विधानांमध्ये कोणताही विरोधाभास नाही असे आपला युक्तिवाद मांडताना एएसजी म्हणाले. याचा याचिकाकर्त्याच्या बाजूने विचार करता येणार नाही. आम्ही तपास सुरू केला तेव्हा आमचा तपास थेट केजरीवाल यांच्याविरोधात नव्हता. तपासादरम्यान त्यांची भूमिका समोर आली. त्यामुळे सुरुवातीला एकही प्रश्न विचारला गेला नाही. तपासाकडे त्या दृष्टीने विचार केला गेला नाही.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी ईडीचे वकील एएसजी राजू यांच्या युक्तिवादावर प्रश्न केला की, तुम्ही विधाने उद्धृत करत जे म्हणत आहात त्या कदाचित तुमच्या कल्पना असू शकतात की किकबॅक देण्यात आला आहे. या विधानांच्या आधारे आम्ही आमचा तपास पुढे नेत असल्याचे एएसजी राजू यांनी सांगितले. त्यातही आम्हाला यश मिळत आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ईडीकडून केसची फाईल मागवली. ईसीआयआर नोंदणीने शरद शेट्टी आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेपूर्वी आणि नंतरची कागदपत्रे मागवली.
दोन वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. 2 वर्षे असाच तपास सुरू ठेवावा, हे कोणत्याही तपास यंत्रणेसाठी योग्य नाही. एएसजी म्हणाले की, गोवा निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल गोव्यातील एका 7 स्टार हॉटेलमध्ये थांबले होते, त्यांच्या खर्चाचा काही भाग रोख घेतलेल्या व्यक्तीने दिला होता. हा मुद्दा राजकीय हेतूने प्रेरित नाही.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी विचारले की, जबाबात केजरीवाल यांचे नाव पहिल्यांदा कधी घेतले गेले? एएसजी राजू यांनी सांगितले की, 23 फेब्रुवारी 2023 रोजी बुची बाबूच्या जबाबात त्यांचे नाव आले होते. एएसजी राजू म्हणाले की, साक्षीदाराने तपास अधिकाऱ्यांना जे काही सांगितले ते तपास यंत्रणेची दिशाभूल करू शकते यावर कोणीही विश्वास ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे आधी आरोपींपर्यंत पोहोचू, अशा पद्धतीने तपास होऊ नये. यामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. एएसजी राजू म्हणाले की, अटकेचे कारण आणि विश्वासाची कारणे सारखीच आहेत. यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले की नाही ते वेगळे आहेत.
2024-05-07T15:59:53Z dg43tfdfdgfd