Trending:


Mumbai Mega Block : मुंबईकरांनो,रविवारी मुलांना घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर थांबा! ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

मुंबई : मुंबईकरांनो (Mumbai News) मुलांना रविवारी बाहेर घेऊन जाण्याचा विचार करात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वीकेंडला घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. मुंबई उपनगरी रेल्वेमार्गांवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वेने रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषीत केला आहे. माटुंगा ते मुलुंड आणि...


Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेबद्दल आणि एकुणच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.


Amol Kolhe: मी रेल्वेची वाट बघत थांबलो होतो, मोदी है तो...; अमोल कोल्हेंचा मोदींना उपरोधिक टोला

Dhule Amol Kolhe News: खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, की अनेक ठिकाणी पंतप्रधानांकडे बघून मतदान करा असे सांगितले जात आहे. पण सोयरीक जुळवताना बापाच्या कर्तृत्वाकडे नव्हे, तर मुलाकडे बघावं लागतं.


MPSC परीक्षेत 3 गुण पडले कमी, 25 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

नितीन नांदुरकर, जळगाव : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये अपयश आलेल्या तरुणाने जीवन संपवल्याची धक्क्दायक घटना जळगावमधील शिरसोली इथं घडलीय. तीन गुण कमी मिळाल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. आकाश भिमराव बारी असं २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमपीएससीच्या क्लर्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने, जळगाव...


बारामतीपाठोपाठ शिरूरच्या EVM गोडाऊनमधली CCTV डिस्प्ले 24 तास बंद!

शिरूर, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभेच्या ईव्हीएमवर सुरक्षिततेसाठीच्या सीसीटीव्हीचा डिस्प्ले 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा वाद उभा राहिला. पण दुसरीकडे शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सीसीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता. याची उमेदवारांच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती. कारण जागेवर कुणीच नव्हते. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली असून, अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात...


Central Railway | मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; काही ट्रेन रद्द

Central Railway block 15 days reason and time table changes


तडका : इ है बंबई नगरिया

संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागलेले आहे. मुंबई केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर पूर्ण भारतातील लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे. अन्य राज्यांमधून मुंबईच्या दिशेने दररोज हजारोंचे लोंढे येत असतात आणि मुंबईची मराठी शहर ही ओळख बदलली जाऊन ती एक कॉस्मोपोलेटियन शहर अशी झालेली आहे, हे मान्यच करावे लागेल. मुंबईची एक वेगळी ओळख देशातच नव्हे, तर जगात आहे. महाराष्ट्राची …


Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Pune bgf jewellers daroda : पुण्यात भर दिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३०० ते ३५० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


मुंबईत नोकरी नाकारणाऱ्या गुजरातमधील कंपनीविरोधात तक्रार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: मुंबईतील गिरगाव येथील एका गुजराती कंपनीत मराठी उमेदवाराला नोकरी नाकारण्यात आली आहे. या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तर कंपनीतील महिलेविरोधात ‘आम्ही गिरगावकर’ या संघटनेच्या वतीने वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत निवेदन दिले आहे. जानवी सरना असे त्या महिलेचे नाव आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे? वूमेनिया …


छत्तीसगडमधील तरुणीवर कोल्हापुरात अत्याचार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील तरुणीला फूस लावून कोल्हापुरात आणून अत्याचार केल्याचे शुक्रवारी उघड झाले. संबंधित तरुणीने शिरोलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी संबंधित तरुणीला घेऊन कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून माजीद खान या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली. दरम्यान, लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत …


Loksabha election 2024 | राऊतांचे शाब्दिक ताशेरे, आठवलेंच्या मार्मिक कविता... ऐका हो ऐका

Loksabha Election 2024 funny videos Aika Ho Aika


PDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबित

PDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबित पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, सोमवारी रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवल्याचा रोहित पवारांनी केला होता आरोप.


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे, पण अजित पवार दोषी नाहीत- फडणवीस

सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य आहे, पण अजित पवार दोषी नाहीत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, अशी स्पष्टोक्ती देखील फडणवीसांनी दिली. हेही पाहा सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीका

मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयावर मुस्ताक खान या माफियाच्या ५० लोकांनी हल्ला केला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते आहेत, असेही सोमय्या म्हणाले. हे व्हिडिओ देखील पाहा Uddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP Majha नकली शिवसेनेच्या (Shiv Sena) टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघला (RSS) संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही,असे घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज मुंबईत इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार, असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव मोदींना आठवत असेल मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांना अजूनही पाकिस्तानची आठवण येत असेल. पाकिस्तानचा झेंडा मी कधी येथे फडकलेला पाहिला नाही. पाकव्याप्त काश्मिर अजून आलेला नाही. यांना कशाचे काही पडले नाही. तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील. आरएसएसवर बॅन भाजप आणेल. 100 =वर्ष पूर्ण होताय हे वर्ष धोक्याचं आहे असा दिसतंय. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील . संघाला तुम्ही नष्ट करायला निघालेत : उद्धव ठाकरे जे पी नड्डा म्हणाले होते एकाच पक्ष देशात राहील. म्हणजे आता हे संघाला सुद्धा नष्ट करायला निघाले आहेत . नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झालाय म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिलाय त्या संघाला तुम्ही नष्ट करायला निघाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.


Jayant Patil On Chhagan Bhujbal : लोकसभेवरून छगन भुजबळ नाराज? जयंत पाटील काय म्हणाले?

नाशिक : नाशिक (Nashik Lok Sabha) अजित पवारांसोबत (Ajit Pawar) शरद पवाराची (Sharad Pawar) साथ सोडून गेलेले अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) भाष्य केलंय. भुजबळ नाराज असल्याचे ऐकलं मात्र माझ्याशी कोणी संपर्क केला नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. ते नाशकात बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, छगन भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकलं.बाकीचे कोण नाराज आहे हे मला माहित नाही. माझ्याशी कोणी संपर्कात नाही. भाजपला दोन पक्ष फोडून देखील त्यांना जनाधार मिळत नाही म्हणून आणखी पक्ष घेत आहे. पक्ष जेवढे एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे तेवढा जनाधार कमी होईल. पक्ष एकत्र करण्याचा काही फायदा होणार नाही.


Traffic Jam | मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Goa National Highway Massive Traffic Jam Of 7 KM


जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा


Narendra Modi Speech Shivaji Park : राज ठाकरेंची विनंती मान्य,शिवाजी पार्कात शब्द,मोदींचं Uncut भाषण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची (Mahayuti) सांगता सभा संपन्न झाली. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि गर्दीच्या वातावरणात ही सभा पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) या सभेच्या प्रथमच जाहीर सभांमधील व्यासपीठावर एकत्र आले होते. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या, त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आपली पहिली मागणी असल्याचं राज यांनी म्हटलं. राज ठाकरेंनंतर पंतप्रधान मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मोदींनी आपल्या भाषणात विकासाकामांचा उल्लेख करत, पुढील 2047 पर्यंतच्या भारताचे स्वप्न दाखवले. तर, नाव न घेता उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) व शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. मुंबईतील शिवाजी पार्कवरुन पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. तसेच, काँग्रेससह इंडि आघाडी म्हणत इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. इंडी आघाडीकडे काय आहे, जेवढी माणसं तेवढ्या घोषणा. इंडिया आघाडीची नजर आपल्या मंदिरांवर आहे, महिलांच्या मंगळसुत्रावर आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना तुमची संपत्ती देऊ शकणार नाहीत, तुमच्या संपत्तीतील निम्मा हिस्सा त्यांचं सरकार घेणार आहे. व्होट जिहाद वाल्यांना ती संपत्ती देण्याचं काम ते करणार आहेत. काँग्रेसला अस्तित्व वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. देशातील लाखो गुंतवणूकदार आज मार्केटसोबत जोडले आहेत. पण, इंडी आघाडीवाले जे कट रचत आहेत, त्यांचा उद्देश देशातील गुंतवणूकदारांचा हा विश्वास तोडण्याचं काम करत आहे, असे म्हणत इंडिया आघाडीच्या धोरणांवर व जाहिरनाम्यावर मोदींनी हल्लाबोल केला.


Arvind Kejriwal speech Bhiwandi : मत नव्हे भीक मागायला आलोय, पवारांसमोर केजरीवालांचं भाषण

Arvind Kejriwal, Bhiwandi Meeting :"विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक केले. काँग्रेस पार्टीचे बँक अकाऊंट फ्रिज केले. शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले, असं करुन निवडणूक लढणार आहात? मोदीजी तुम्ही भित्रे आहात", असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. भिवंडीत इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडणार आहे. तत्पूर्वी केजरीवालांनी भिवंडीतील सभेलाही हजेरी लावली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार करुन दिले. मात्र, मला शुगर आहे, जेलमध्ये मला 15 दिवस गोळ्या घेऊ दिल्या नाहीत. मला रोज चार वेळेस इंजक्शन लागते. मी तुरुंगात असताना मला इंजक्शन देखील घेऊ देत नव्हते. मला जेलमध्ये टाकून दिल्लीतील लोकांना मोफत मिळणारी वीज बंद करु इच्छित आहेत. पुतीनने विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले किंवा मारुन टाकले. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तशीच अवस्था आहे. मोदीजी भारतातही तसंच करु इच्छित आहेत. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीवरुन आलोय. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय. काही दिवसांपूर्वी माझी तुरुंगातून सुटका झाली. मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो, त्यांनी माझी सुटका केली. मला वाटत नव्हते, की माझी एवढ्या लवकर सुटका होईल. मी ठरवलंय, 21 दिवस झोपणार नाही. 24 तास संपूर्ण देशात फिरुन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.


नितीन गडकरी श्री काळाराम चरणी लीन

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय रस्ते, वाहतूक व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी श्री काळाराम मंदिरात महापूजा, अभिषेक करून प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. महंत सुधीर पुजारी यांनी प्रधान संकल्प सोडला. यावेळी महावस्त्र व प्रसाद देऊन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त गडकरी नाशिकला आले होते. त्यावेळी श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने …


RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेत आजपासून अर्ज करा; शिक्षण विभागाची माहिती

Right To Education Admission : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने उद्या शुक्रवारी १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.


मुस्लिमांबाबत मोदींची भूमिका दुतोंडी – मुजफ्फर हुसेन

आता खुद्द नरेंद्र मोदीच मुस्लिम समाजाविरोधात उघडपणे भूमिका मांडत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे, असे हुसेन यांनी सांगितले.


VIDEO | लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार

Fifth Phase Of Lok Sabha Election Campaign To End Today


Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Shocking News: पुण्यातील वाकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावले.


ABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं मोठं वक्तव्य ((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण मात्र गुलदस्त्यातच ((राज ठाकरे, शेलारांमध्ये खलबतं)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर ((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी ((हरियाणात बसला आग, ८ भाविक मृत्युमुखी)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((तारक मेहता फेम 'सोढी'ची घरवापसी))