CV आणि Resume मध्ये फरक काय? 99 टक्के लोक चुकीच्या ठिकाणी वापरताच चुकीचा शब्द
नोकरीसाठी अर्ज करताना ‘CV’ आणि ‘Resume’ हे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो किंवा वापरतो. पण आजही अनेकांना या दोघांमधील फरक माहिती नाही. ही माहिती उमेदवारांसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या शब्दाचा वापर केलात, तर तुमच्या हातची नोकरी जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया CV आणि Resume मधील नेमका फरक काय आहे. CV म्हणजे काय?CV म्हणजे "Curriculum Vitae" – हा एक तपशीलवार दस्तावेज असतो, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल दिलेलं असतं. यात तुमचे शिक्षण, कामाचा अनुभव, प्रोजेक्ट, रिसर्च, सेमिनार, पब्लिकेशन्स, स्किल्स इत्यादींचा सविस्तर उल्लेख केला जातो. CV मुख्यतः शिक्षण, संशोधन, शैक्षणिक नोकऱ्या, किंवा परदेशातील नोकऱ्यांसाठी वापरला जातो. CV हा 2 पानांपासून 5-6 पानांचाही असू शकतो. शिवाय यावर Academic आणि Professional Journey ची सविस्तर माहिती Resume म्हणजे काय?Resume हा CV चा छोटा आणि लक्षवेधी प्रकार आहे. यात उमेदवाराचे महत्त्वाचे गुण, कौशल्यं आणि अनुभव थोडक्यात सांगितले जातात. Resume प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा IT/Marketing क्षेत्रात नोकरीसाठी दिला जातो. याच्या पानांची लांबी ही 1 ते 2 पाने असते. यात Fast आणि Relevant माहिती दिली जाते.[caption id="attachment_1417557" align="alignnone" width="1200"]CV वेळोवेळी अपडेट केला जातो, Resume नोकरीच्या प्रकारानुसार बदलतो." width="1200" height="900" /> काही मुख्य फरक थोडक्या शब्दात समजून घेऊCV सविस्तर माहिती देतो, तर Resume थोडक्यात लक्षवेधी माहिती देतो.CV वेळोवेळी अपडेट केला जातो, Resume नोकरीच्या प्रकारानुसार बदलतो.[/caption] भारतात दोन्ही संज्ञा वापरल्या जातात, पण विदेशात CV अधिक अकॅडमिक वापरासाठी असतो. नोकरीच्या स्वरूपानुसार CV किंवा Resume तयार करणं गरजेचं आहे. योग्य स्वरूप निवडलं, तर तुम्ही नोकरीच्या शर्यतीत एक पाऊल पुढे असता.
2025-06-17T16:54:50Z
Pandhrpur Waari 2025 : वारकऱ्यांसाठी 30 टक्के खुशखबर Special Report
Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Governmant) मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा शासन निर्णय (GR) देखील राज्य सरकारने जारी केला आहे. मागील वर्षी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.20,000 इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले होते. सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20,000 रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' उपक्रम दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच, दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे.
2025-06-17T17:43:03Z
Marathi News Headlines | 4 PM | News18 Lokmat | 18 June 2025 | Mumbai Rain | Tukaram Maharaj Palkhi
Marathi News Headlines | 3 PM | News18 Lokmat | 18 June 2025 | Mumbai Rain | Thackeray Yuti #Headline #MarathiHeadline #news18lokmat #mumbairain #monsoonupdate #vaishnavihagwane #marathinews #breakingnews #headline #todaynews #topnews #newsupdate News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #UTNAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T10:45:02Z
Dada Bhuse On Hindi Bhasha Sakti : तिसरी भाषा अनिवार्य, दादा भुसेंनी नीट समजावून सांगितलं
MNS Chief Raj Thackeray has taken a strong stand against the compulsory imposition of Hindi in Maharashtra. He asserted, “MNS will not tolerate forced Hindi in the state.” His statement comes amid ongoing debates over the three-language formula in schools. The issue has reignited discussions on linguistic identity and cultural autonomy in Maharashtra.#DadaBhuse #RajThackeray #MNS #HindiBashaSakti #MarathiLanguage #MaharashtraPolitics #RajThackeraySpeech #BreakingNews #LanguageDebate #ThreeLanguageFormula #RajThackerayOnHindiNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T08:59:53Z
6000 अपघात, 9000 जणांची मृत्यू; 'या' कंपनीची विमानं शापित आहेत काय?
एअर इंडियाचे बोइंग AI-171 विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातानंतर बोइंग विमानांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर अनेक धक्कादायक अहवाल समोर आले आहेत. कधी विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले, तर कधी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द करावे लागले. जगभरात अनेक विमान अपघात झाले आहेत, परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे गेल्या दशकात झालेल्या एकूण विमान अपघातांपैकी जवळपास निम्मे अपघात बोइंग विमानांचे झाले आहेत. एकट्या भारतात गेल्या दहा वर्षांत दोन मोठे अपघात झाले आणि दोन्ही अपघात बोइंग विमानांचेच होते. त्यामुळे प्रश्न असा आहे की, एकेकाळी सर्वात विश्वासार्ह आणि सुरक्षित विमान म्हणून ओळखले जाणारे बोइंग आज संशयाच्या आणि प्रश्नांच्या केंद्रस्थानी का आहे? बोइंग विमानांच्या सुरक्षेबाबत इतके प्रश्न का उपस्थित केले जात आहेत? हे उत्पादनातील दोष (manufacturing defect), रचनेतील त्रुटी (design flaw) की कंपनीचा निष्काळजीपणा आहे? $161.36 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती असलेली बोइंग कंपनी आज अपघातांमुळे कुप्रसिद्ध झाली आहे. अमेरिकन वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या अहवालानुसार, बोइंगच्या 108 वर्षांच्या इतिहासात 6000 हून अधिक विमान अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 9000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बोइंगच्या 450 हून अधिक मोठ्या अपघातांमध्ये मृतांचा आकडा 2 पासून 583 पर्यंत आहे. बोइंगची सुरक्षा आणि तांत्रिक त्रुटी बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बॅटरीच्या समस्यांपासून ते हवेत उडताना दरवाजा उघडण्यासारख्या भयंकर घटना घडल्या आहेत. 2013 मध्ये, बोइंग ड्रिमलायनरमध्ये बॅटरीची समस्या निर्माण झाली होती. बोइंगच्या लिथियम-आयन बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे दोन जपानी विमानांनी पेट घेतला होता. या घटनेनंतर बोइंग ड्रिमलायनरच्या उड्डाणांवर तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. 2013 मध्येच लंडनच्या धावपट्टीवर एका बोइंग विमानाला आग लागली, ज्यासाठी शॉर्ट सर्किटला जबाबदार धरण्यात आले. 2021 मध्ये, एका तपासात 100 हून अधिक बोइंग ड्रिमलायनर विमानांमध्ये इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये दोष असल्याचे आढळून आले. या दोषांमुळे त्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली. 2024 मध्ये, सिडनीहून ऑकलंडला जाणारे बोइंग विमान हवेत असताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. त्याच वर्षी, सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या बोइंग विमानाच्या कॉकपिटची काच हवेत फुटली. 2024 मध्येच अलास्का एअरलाइन्सच्या विमानातून उड्डाण घेत असताना एक दरवाजा तुटून वेगळा झाला. या घटनेसाठी बोइंगला $160 दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागली होती. इतकेच नाही, तर आगीचा इशारा, विंडस्क्रीनला तडे जाणे आणि लँडिंग गिअर अडकणे अशा अनेक तक्रारी बोइंगविरोधात आल्या आहेत. बोइंगचे अभियंता जोशुआ डीन यांनी 737 मॅक्स विमानातील डिझाइनमधील त्रुटी उघड केल्या होत्या. त्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. 2024 मध्ये त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. 2019 मध्ये, बोइंगचे गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापक डॉन बर्नेट यांनी 787 ड्रिमलायनरमधील दोष उघड केले आणि बोइंगवर खटला दाखल केला. परंतु, 2024 मध्ये त्यांचाही मृत्यू झाला. बोइंगला केवळ प्रवासी विमानांमध्येच नव्हे, तर लष्करी विमानांमध्येही दोष आढळले आहेत. वारंवार तक्रारी करूनही बोइंगला एकापाठोपाठ एक ऑर्डर मिळत आहेत. फक्त भारताविषयी बोलायचे झाल्यास, गेल्या 10 वर्षांत दोन मोठे विमान अपघात झाले आहेत आणि दोन्ही बोइंग विमानांचे होते. ऑगस्ट 2020 मध्ये, एअर इंडियाचे बोइंग 737-8HG विमान केरळच्या कोझिकोडमध्ये कोसळले आणि 2025 मध्ये, एअर इंडियाचे बोइंग 787-8 ड्रिमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले. बोइंगच्या विमानांवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही, कंपनीला मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये कधीही कमतरता आलेली नाही. 2025 हे वर्ष बोइंगसाठी आतापर्यंतचे सर्वात फायदेशीर वर्ष ठरले. या वर्षात कंपनीला बोइंग विमानांसाठी 512 ऑर्डर्स मिळाल्या, जे प्रतिस्पर्धी एअरबसच्या तुलनेत दुप्पट होते.
2025-06-18T07:25:43Z
Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 12.30 AM | News18 Lokmat | 18 June 2025
Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 10.30 AM | News18 Lokmat | 18 June 2025#Mahatvachyabatmya #monsoonupdate #news18lokmat #vaishnavihagwane #AshadhiWari2025 #Wari2025 #pakistan #india #news18lokmat #mumbailocaltrain #shku #ahemdabad #planecrash #Kundamalabridge #puneNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #UTNAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T07:44:52Z
Sharad Pawar Full Speech : भाजपसह गेलेले संधीसाधू, आता सोबत घेणार नाही, पवारांचं वक्तव्य ABP MAJHA
Sharad Pawar and Ajit Pawar NCP: सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत (BJP) गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. ते मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळल्याची चर्चा सुरु झाली आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
2025-06-17T09:56:47Z
Uddhav Thackeray Shivsena Baithak : उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, कारण काय?
Uddhav Thackeray Shivsena Baithak : उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, कारण काय?#uddhavthckeray #rajthackeray #mnsshivsena #news18lokmat #RajThackeray #UddhavRajAlliance #MNS #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #BMC2025 #ThackerayReunion #RajThackerayPressConference #DevendraFadnavis #PoliticalBuzz News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T05:14:44Z