बातम्या

Trending:


Israel-Iran Conflict: इस्रायल-इराण युद्ध जगाला भोगावं लागणार? कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका, सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ!

Global Oil Market News: इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या उत्पादनावर होताना दिसत आहे.


अग्रलेख: वर्ण व्रणांवर विजय!

बवुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा विजय हा कामगिरीतून उत्तर द्यायचे, भावनावेगात वाहून जायचे नाही या शहाणिवेचा आविष्कार आहे.


Jalna News : जिल्हा परिषद शाळांमधील ४०५ वर्गखोल्या धोकादायक

आप्पासाहेब खर्डेकर जालना : गेल्या अनेक वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या १४९४ शाळा आहेत. या शाळांमधील ४०५ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या धोकादायक झाल्या आहेत. ह्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत. अनेक शाळामध्ये एका वर्गखोलीत दोन ते तीन वर्ग बसविण्यात येत आहे. शिक्षण विभागाने लक्ष...


Chhatrapati Sambhajinagar : आजोबांचं प्रेम, आजींची स्वप्नपूर्ती, ज्वेलर्सचा मोठेपणा Special Report

आता पाहूयात एक अनोखी कहाणी... छत्रपती संभाजीनगरमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आहे एका वृद्ध जोडप्याचा... आपल्या पत्नीला दागिना घेऊन देण्यासाठी नव्वदीतले एक आजोबा ज्वेलरी शॉपमध्ये शिरतात... त्यावेळी त्यांना काय अनुभव आला.... त्यांचा व्हिडीओ इतका व्हायरल का झाला? पाहूयात या वृद्ध जोडप्यांच्या आयुष्यातल्या सोनेरी क्षणांची ही कहाणी...९३ वर्षांचे आजोबा...आणि त्यांची ही साधारण सत्तरीतली पत्नी...आजोबांना आपल्या लाडक्या बायकोला द्यायचा होता एक दागिना...आणि म्हणून संभाजीनगरच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये हे जोडपं शिरलं...पण इथे जे घडलं तो या जोडप्याच्या आजवरच्या कष्टाच्या आय़ुष्यातलाएक फार मोठा सुखाचा क्षण((व्हिज्युअल मोंटाज....विथ म्युझिक इम्पॅक्ट...))हातात फारसं काही नसताना एक माळआणि मंगळसूत्रातलं डोरलं आजींनी घेतलं...आणि दुकानदाराच्या हातात असतील नसतील तेवढ्या नोटा ठेवल्या...((व्हिडीओ... दुकानदार नोटा मोजतानाचे))पण दुकानदारानं या आजोबांच्या डोळ्यातआजींसाठीचं प्रेम पाहिलं...आणि त्यांंनी केलेल्या हजारोंच्या खरेदीच्या बदल्यातअवघे वीस रुपये आणि त्यांचे आशीर्वाद घेतले....((व्हिडीओ विथ अँबियन्स...))यावेळी एबीपी माझाशी बोलताना या कृतीबद्दल त्यांनी काय म्हटलंय... तुम्हीच ऐका....बाईट - सुवर्णकार((त्यांचं प्रेम पाहून भारावून गेलो. कितीही छोटं वाटेल ते दागिनं, पण त्यामागचं प्रेम... सार सांगून जाणार होत))मूळचं जालन्यातलं हे जोडपं आता माधुकरी मागत आयुष्य जगतंय...एका मुलाचं निधन झालं तर दुसरा मुलगा दारुच्या व्यसनापायी वाया गेला...मग या आजी आजोबांनी आपलं पुढचं आयुष्य घराबाहेरच जगायचं ठरवलं...((व्हिज्युअल्स...))पण संभाजीनगरच्या घटेनंतर...आजी आजोबांचा आणि दुकानदाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाआणि व्हिडीओ पाहिलेल्या प्रत्येकानं एकच भावना व्यक्त केलीती म्हणजे.... प्रेम असावं तर असं...अगदी निस्सिम आणि निर्व्याज...एन्ड पीटीसी - कृष्णा केंडे, एबीपी माझा, छ. संभाजीनगर


Cracks on Tansa river bridge: सावरोली गावाजवळील तानसा नदी पुलाला भेगा

वाडा : मच्छिंद्र आगिवले वाडा ते वाशिंद हा मार्ग नाशिक महामार्गाला जोडणारा सोयीचा दुवा असून ठाणे व कल्याणकडे जाण्यासाठी अलिकडे सर्वात जास्त वापरला जाणारा रस्ता आहे. सोमवारी या मार्गावरील सावरोली गावाजवळील तानसा नदीच्या पुलाला तडा जाऊन पुलावरच काही ठिकाणी रस्ता खचल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या मार्ग...


IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील चार बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.कोणत्या अधिकाऱ्याच्या कुठे बदल्या?१. पराग सोमण (IAS:SCS:2014) मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई मेट्रो प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांची वर्धा येथील जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती...


BOT infrastructure project : विरार-अलिबाग पहिला टप्पा ‘बीओटी’वर

मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची उभारणी ’बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासाठी 22 हजार 250 कोटी रुपये आणि त्यावरील व्याजापोटी 14 हजार 763 कोटी अशा एकूण 37 हजार 13 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विरार...


Sangli Theft News | ह्युंदाई शोरूम फोडण्यामागे गुजरातची टोळी

सांगली : कोल्हापूर रोडवरील माई ह्युंदाई या शोरूममध्ये चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. या चोरीमागे गुजरातच्या टोळीचा हात असल्याचे तपासात समोर आले असून टोळीचा प्रमुख दिनेश गजेंद्र मोहिते (वय 27, रा. लवाछा, ता. वापी, गुजरात) याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. टोळीतील अन्य चारजणांची नावे निष्...


​​Pune TDR: टीडीआरची लगीनघाई

​​Pune TDR: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली काही वर्षे झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या सर्व महापालिका, जिल्हा परिषदा व नगरपालिकांमध्ये प्रशासकराज सुरू आहे.


Dombivli KDMCC School Building |डोंबिवलीत केडीएमसी शाळेची नवी इमारत

New School Building Bhoomipujan डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक ८२ च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील ब्राह्मणसभा हॉलच्या मागे असलेल्या या शाळेच्या भूखंडावर आलेल्या शाळेची इमारत पूर्ण जीर्ण झाली होती. आत...


Hindi Language Compulsion | हिंदी सक्तीचा अप्रत्यक्ष आदेश पुन्हा जारी !

पवन होन्याळकर मुंबई : इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही ‘सर्वसाधारणपणे’ तृतीय भाषा असावी, असा निर्णय जाहीर करत हिंदी शिकण्याची सक्ती करणारा आदेशच पुन्हा जारी केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी 17 जून रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जाईल...


Blaise Metreweli: माय नेम इज ‘ब्लेझ’...

Blaise Metreweli: ब्रिटनच्या ‘एमआय ६’ या गुप्तहेर विभागाच्या प्रमुखपदी ब्लेझ मेट्रेवेली यांची नियुक्ती झाल्याने गेल्या ११५ वर्षांच्या इतिहासात नावाजलेल्या या संस्थेच्या प्रमुखपदाची सूत्रे एका महिलेकडे आली आहेत.


Mumbai News Live Updates: मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर शहरातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर…

मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या


CV आणि Resume मध्ये फरक काय? 99 टक्के लोक चुकीच्या ठिकाणी वापरताच चुकीचा शब्द

नोकरीसाठी अर्ज करताना ‘CV’ आणि ‘Resume’ हे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो किंवा वापरतो. पण आजही अनेकांना या दोघांमधील फरक माहिती नाही. ही माहिती उमेदवारांसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या शब्दाचा वापर केलात, तर तुमच्या हातची नोकरी जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया CV आणि Resume मधील नेमका फरक काय आहे. CV म्हणजे काय?CV म्हणजे "Curriculum Vitae" – हा एक तपशीलवार दस्तावेज असतो, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल दिलेलं असतं. यात तुमचे शिक्षण, कामाचा अनुभव, प्रोजेक्ट, रिसर्च, सेमिनार, पब्लिकेशन्स, स्किल्स इत्यादींचा सविस्तर उल्लेख केला जातो. CV मुख्यतः शिक्षण, संशोधन, शैक्षणिक नोकऱ्या, किंवा परदेशातील नोकऱ्यांसाठी वापरला जातो. CV हा 2 पानांपासून 5-6 पानांचाही असू शकतो. शिवाय यावर Academic आणि Professional Journey ची सविस्तर माहिती Resume म्हणजे काय?Resume हा CV चा छोटा आणि लक्षवेधी प्रकार आहे. यात उमेदवाराचे महत्त्वाचे गुण, कौशल्यं आणि अनुभव थोडक्यात सांगितले जातात. Resume प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा IT/Marketing क्षेत्रात नोकरीसाठी दिला जातो. याच्या पानांची लांबी ही 1 ते 2 पाने असते. यात Fast आणि Relevant माहिती दिली जाते.[caption id="attachment_1417557" align="alignnone" width="1200"]CV वेळोवेळी अपडेट केला जातो, Resume नोकरीच्या प्रकारानुसार बदलतो." width="1200" height="900" /> काही मुख्य फरक थोडक्या शब्दात समजून घेऊCV सविस्तर माहिती देतो, तर Resume थोडक्यात लक्षवेधी माहिती देतो.CV वेळोवेळी अपडेट केला जातो, Resume नोकरीच्या प्रकारानुसार बदलतो.[/caption] भारतात दोन्ही संज्ञा वापरल्या जातात, पण विदेशात CV अधिक अकॅडमिक वापरासाठी असतो. नोकरीच्या स्वरूपानुसार CV किंवा Resume तयार करणं गरजेचं आहे. योग्य स्वरूप निवडलं, तर तुम्ही नोकरीच्या शर्यतीत एक पाऊल पुढे असता.


Solapur Accident News | टँकर-कंटेनरचा भीषण अपघात

सोलापूर : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर मुळेगाव तांड्याजवळ मंगळवारी ( दि. 17) दुपारी चारच्या सुमारास रसायन घेऊन जाणारा टँकर आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. एकजण गंभीर जखमी आहे. पश्चिम बंगाल येथील रसायन घेऊन जाणार टँकर आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कंटेनरचा पुढचा आणि मागचा भा...


Malegaon Sugar Factory Election | अजित पवार पॅनलचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या भेटीला

बारामती | पुढारी वृत्तसेवा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात असून २२ जूनला मतदान होणार आहे. २४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या नीलकंठेश्वर पॅनलचे कार्यकर्ते सोमवारी गोविंद बागेत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी दाखल झ...


World Elder Abuse Prevention Day 2025: ज्येष्ठांचा मान राखण्यासाठी...

World Elder Abuse Prevention Day 2025: सन २०११मध्ये संयुक्त राष्ट्रांनी १५ जून हा 'ज्येष्ठ नागरिक अत्याचार जनजागृती दिन' म्हणून घोषित केला. नुकत्याच साजऱ्या झालेल्या या दिवसाच्या निमित्ताने या विषयाचा हा आढावा...


Illegal schools : भिवंडीतील बेकायदा शाळांचे वीज, पाणी कनेक्शन तोडणार

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात परवानगीशिवाय चालणाऱ्या बेकायदेशीर शाळांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भिवंडीतील बेकायदा शाळांविरोधातील ल कारवाईची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने केली असून आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर याची दखल घेत मनपा प्रशासनाने बेकायदा शाळांचे वीज आणि पाणी जोडणी खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिका प्र...


Satara News | महामार्ग मजबुतीकरणाचे काम युद्ध पातळीवर

पाटण : कोयना विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाजेगाव येथे वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेला आहे. या परिसरात आता मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून 24 तासानंतरही कराड - चिपळूण मार्गावरील वाहतूक ठप्पच आहे. कराड - चिपळूण मार्गावरील वाजेगावनजीक नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरात पर्यायी रस्ता तयार कर...


PM Modi Giorgia Meloni Meet : ‘तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत’, पीएम मोदी मेलोनी यांना असं का म्हणाले?

PM Modi Giorgia Meloni Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर सम्मेलनादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. जॉर्जिया मेलोनी यांनी यावेळी पीएम मोदी यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. त्यावर मोदींनी 'तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत' अशी Reaction दिली आहे.


Parli Valley landslide | परळी खोर्‍यात भूस्खलन

सातारा/परळी : जिल्ह्यात पश्चिमेकडे मान्सून पावसाने जोर पकडला आहे. मंगळवारी सातारा, वाई, जावली, पाटण, कराड तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. परळी खोर्‍यात तर पावसाची संततधार सुरू असून उरमोडी धरणाच्या पलीकडे असलेल्या कुरळबाजी गावच्या डोंगरावरील मातीचा भराव निसटू लागला आहे. त्यामुळे भूस्लखन होऊन पायथ्याला असलेल्या शेतीचे नुकसान झाले. काही झाडेही उ...


Marathi News Headlines | 4 PM | News18 Lokmat | 18 June 2025 | Mumbai Rain | Tukaram Maharaj Palkhi

Marathi News Headlines | 3 PM | News18 Lokmat | 18 June 2025 | Mumbai Rain | Thackeray Yuti #Headline #MarathiHeadline #news18lokmat #mumbairain #monsoonupdate #vaishnavihagwane #marathinews #breakingnews #headline #todaynews #topnews #newsupdate News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #UTNAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Advanced rescue tools fire brigade | बुडालेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी अग्निशमन दलात आधुनिक यंत्र

मनवेलपाडा : पावसाळ्यात तलाव, नदी, नाले, ओढे, खदानी अशा ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्ती बुडून मरण पावतात. अशा बुडलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणाना कसरत करावी लागते. पाणबुड्या, तैराकी, स्थानिकांची मदत घायवी लागते. अनेक प्रयत्नानंतर अशा व्यक्तींना बाहेर काढण्यात बराच वेळ लागतो. पाण्यात बुडाल्यानंतर त्या व्यक्तीचा लगेच शोध घ्यावा या द...


Bandra to Kashimira travel time : वांद्रे ते काशिमिरा प्रवासासाठी लागतात तब्बल 2 तास!

मुंबई : राजेश सावंत नरिमन पॉईंट ते वांद्रे 20 ते 22 मिनिटात पोचणार्‍या वाहन चालकांना सायंकाळी पाच वाजल्यानंतर वांद्रे ते काशिमिरा अवघ्या अर्ध्या तासाच्या प्रवासाला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. अनेकदा तीन ते चार तास अडकून पडावे लागते. वाहतूक कोंडीमुळे होणारी ही रखडपट्टी नित्याची झाल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास वाहन चालकांसाठी ...


Ahmedabad Plane Crash : नियतीनेच पालकांचा 'तो' प्रश्न सोडवला; लेकीचं आई-वडिलांच्या निधनावर भावनिक पत्र

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात वडोदराच्या वल्लभभाई आणि वीनाबेन अधेडा यांचं निधन झालं. यावेळी लंडनमध्ये स्थायिक असलेल्या लेकीने लिहं भावूक पत्र.


Bhandara Bribery Case | लाचखोर पोलिसाला अटक

10000 Rupees Bribe Case भंडारा: तडीपार असलेल्या आरोपीवर पुन्हा तडीपारीची कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी पवनी पोलिस ठाण्यात करण्यात आली. अजित प्रल्हाद वाहने (३७) रा. पवनी असे आरोपी पोलिस नाईकचे नाव असून तो पवनी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आहे. या...


Ashadhi Wari 2025: पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवार (दि. 19) जून रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार असून, या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागातर्फे विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. 17 ते 20 जून या कालावधीत विविध मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार असून, काही मार्गांवर पूर्णतः बंदी लागू करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांच...


Pune Politics| पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होणार? मुंबईतील बैठकीत आज निर्णय

पुणे : महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आज (दि.१८) दुपारी आयोजित केली आहे. ही बैठक मुंबईतील टिळक भवनात होणार असून त्यामध्ये पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा...


जळगाव जिल्ह्यात काँग्रेसलाही गळती

काँग्रेसचे यावल तालुक्यातील काही जुने पदाधिकारी भाजपच्या गळाला लागल्याने काँग्रेस धास्तावली आहे.


Uddhav Thackeray Shivsena Baithak : उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, कारण काय?

Uddhav Thackeray Shivsena Baithak : उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, कारण काय?#uddhavthckeray #rajthackeray #mnsshivsena #news18lokmat #RajThackeray #UddhavRajAlliance #MNS #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #BMC2025 #ThackerayReunion #RajThackerayPressConference #DevendraFadnavis #PoliticalBuzz News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील इंधनाच्या किमती बदलल्या, मुंबई-पुण्यात पेट्रोलचा भाव काय?

Today’s Petrol Diesel Price in Marathi: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या.


Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना उत्तर, “विद्यार्थी आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा…”

राज ठाकरे आणि माझी या विषयाबाबत चर्चा झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तीन भाषांचं आहे मग राज्यात दोन भाषाच कशा ठेवणार? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


खरेदीचा बहाण्याने सराफी पेढीत चोरी

वडगाव शेरी भागातील एका सराफी पेढीत खरेदीचा बहाणा करून दोन महिलांनी ६० हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना घडली.


Pandhrpur Waari 2025 : वारकऱ्यांसाठी 30 टक्के खुशखबर Special Report

Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Governmant) मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा शासन निर्णय (GR) देखील राज्य सरकारने जारी केला आहे. मागील वर्षी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.20,000 इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले होते. सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20,000 रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' उपक्रम दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच, दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे.


Sudhakar Budgujar| शक्तिप्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश

Sudhakar Budgujar Finally To Join BJP Today Update


इचलकरंजीत विद्यार्थ्याची आत्महत्या

आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप


RRB Recruitment: रेल्वेत 6000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती; कधी कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून जगभरातील तरुणांसाठी टेक्नीशियन ग्रेड-1 आणि ग्रेड-III च्या एकूण 6180 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे.


6000 अपघात, 9000 जणांची मृत्यू; 'या' कंपनीची विमानं शापित आहेत काय?

एअर इंडियाचे बोइंग AI-171 विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातानंतर बोइंग विमानांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर अनेक धक्कादायक अहवाल समोर आले आहेत. कधी विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले, तर कधी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द करावे लागले. जगभरात अनेक विमान अपघात झाले आहेत, परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे गेल्या दशकात झालेल्या एकूण विमान अपघातांपैकी जवळपास निम्मे अपघात बोइंग विमानांचे झाले आहेत. एकट्या भारतात गेल्या दहा वर्षांत दोन मोठे अपघात झाले आणि दोन्ही अपघात बोइंग विमानांचेच होते. त्यामुळे प्रश्न असा आहे की, एकेकाळी सर्वात विश्वासार्ह आणि सुरक्षित विमान म्हणून ओळखले जाणारे बोइंग आज संशयाच्या आणि प्रश्नांच्या केंद्रस्थानी का आहे? बोइंग विमानांच्या सुरक्षेबाबत इतके प्रश्न का उपस्थित केले जात आहेत? हे उत्पादनातील दोष (manufacturing defect), रचनेतील त्रुटी (design flaw) की कंपनीचा निष्काळजीपणा आहे? $161.36 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती असलेली बोइंग कंपनी आज अपघातांमुळे कुप्रसिद्ध झाली आहे. अमेरिकन वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या अहवालानुसार, बोइंगच्या 108 वर्षांच्या इतिहासात 6000 हून अधिक विमान अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 9000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बोइंगच्या 450 हून अधिक मोठ्या अपघातांमध्ये मृतांचा आकडा 2 पासून 583 पर्यंत आहे. बोइंगची सुरक्षा आणि तांत्रिक त्रुटी बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बॅटरीच्या समस्यांपासून ते हवेत उडताना दरवाजा उघडण्यासारख्या भयंकर घटना घडल्या आहेत. 2013 मध्ये, बोइंग ड्रिमलायनरमध्ये बॅटरीची समस्या निर्माण झाली होती. बोइंगच्या लिथियम-आयन बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे दोन जपानी विमानांनी पेट घेतला होता. या घटनेनंतर बोइंग ड्रिमलायनरच्या उड्डाणांवर तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. 2013 मध्येच लंडनच्या धावपट्टीवर एका बोइंग विमानाला आग लागली, ज्यासाठी शॉर्ट सर्किटला जबाबदार धरण्यात आले. 2021 मध्ये, एका तपासात 100 हून अधिक बोइंग ड्रिमलायनर विमानांमध्ये इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये दोष असल्याचे आढळून आले. या दोषांमुळे त्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली. 2024 मध्ये, सिडनीहून ऑकलंडला जाणारे बोइंग विमान हवेत असताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. त्याच वर्षी, सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या बोइंग विमानाच्या कॉकपिटची काच हवेत फुटली. 2024 मध्येच अलास्का एअरलाइन्सच्या विमानातून उड्डाण घेत असताना एक दरवाजा तुटून वेगळा झाला. या घटनेसाठी बोइंगला $160 दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागली होती. इतकेच नाही, तर आगीचा इशारा, विंडस्क्रीनला तडे जाणे आणि लँडिंग गिअर अडकणे अशा अनेक तक्रारी बोइंगविरोधात आल्या आहेत. बोइंगचे अभियंता जोशुआ डीन यांनी 737 मॅक्स विमानातील डिझाइनमधील त्रुटी उघड केल्या होत्या. त्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. 2024 मध्ये त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. 2019 मध्ये, बोइंगचे गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापक डॉन बर्नेट यांनी 787 ड्रिमलायनरमधील दोष उघड केले आणि बोइंगवर खटला दाखल केला. परंतु, 2024 मध्ये त्यांचाही मृत्यू झाला. बोइंगला केवळ प्रवासी विमानांमध्येच नव्हे, तर लष्करी विमानांमध्येही दोष आढळले आहेत. वारंवार तक्रारी करूनही बोइंगला एकापाठोपाठ एक ऑर्डर मिळत आहेत. फक्त भारताविषयी बोलायचे झाल्यास, गेल्या 10 वर्षांत दोन मोठे विमान अपघात झाले आहेत आणि दोन्ही बोइंग विमानांचे होते. ऑगस्ट 2020 मध्ये, एअर इंडियाचे बोइंग 737-8HG विमान केरळच्या कोझिकोडमध्ये कोसळले आणि 2025 मध्ये, एअर इंडियाचे बोइंग 787-8 ड्रिमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले. बोइंगच्या विमानांवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही, कंपनीला मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये कधीही कमतरता आलेली नाही. 2025 हे वर्ष बोइंगसाठी आतापर्यंतचे सर्वात फायदेशीर वर्ष ठरले. या वर्षात कंपनीला बोइंग विमानांसाठी 512 ऑर्डर्स मिळाल्या, जे प्रतिस्पर्धी एअरबसच्या तुलनेत दुप्पट होते.


Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 12.30 AM | News18 Lokmat | 18 June 2025

Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 10.30 AM | News18 Lokmat | 18 June 2025#Mahatvachyabatmya #monsoonupdate #news18lokmat #vaishnavihagwane #AshadhiWari2025 #Wari2025 #pakistan #india #news18lokmat #mumbailocaltrain #shku #ahemdabad #planecrash #Kundamalabridge #puneNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #UTNAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Dada Bhuse On Hindi Bhasha Sakti : तिसरी भाषा अनिवार्य, दादा भुसेंनी नीट समजावून सांगितलं

MNS Chief Raj Thackeray has taken a strong stand against the compulsory imposition of Hindi in Maharashtra. He asserted, “MNS will not tolerate forced Hindi in the state.” His statement comes amid ongoing debates over the three-language formula in schools. The issue has reignited discussions on linguistic identity and cultural autonomy in Maharashtra.#DadaBhuse #RajThackeray #MNS #HindiBashaSakti #MarathiLanguage #MaharashtraPolitics #RajThackeraySpeech #BreakingNews #LanguageDebate #ThreeLanguageFormula #RajThackerayOnHindiNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Chandrapur : नागभीड वनपरिक्षेत्रात आढळला अस्वलाच्या पिल्लाचा मृतदेह

चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा उपक्षेत्रातील मांगली कक्ष क्रमांक ४८ मध्ये मंगळवारी (दि.१७) एका अस्वलाच्या पिल्लाचा मृतदेह आढळून आला. या पिल्लाचे वय अंदाजे एक वर्ष असून त्याच्या मृत्यूचे कारण हिस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. Haryana model murder | हरियाणातील मॉडेलचा...


Pudhari Special Ground Report Dwarka Chowk Nashik | सर्कल हटवले, भुयारी मार्गाचे काय?

नाशिक : टीम दैनिक पुढारी शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या द्वारका चौकाला लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटण्यासाठी 'सर्कल' हटविण्याचा पर्याय निवडला असला तरी, मुख्य प्रश्न पूर्णत: निकाली निघालेला नाही. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी चौकात केलेल्या भुयारी मार्गाचे चारही डोम वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याने त्याबाबतदेखील वेळीच निर्णय घेण्याची गरज आहे. य...


कोकणच्या अर्थव्यवस्थेवर अस्मानी संकट

जान्हवी पाटील आंबा हंगाम अडचणीत सापडलेला असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाची भर पडली. त्याचा सर्वाधिक फटका कॅनिंगला बसला. दुसरीकडे मच्छीमारी आणि पर्यटन हे दोन्ही व्यवसाय पंधरा दिवस आधीच गुंडाळावे लागले. कोकणची अर्थव्यवस्था आंबा, मासळी आणि पर्यटन यावर अवलंबून असते; मात्र यंदा मे महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने तिन्ही व्यवसायांना फटका बसलेला आहे. मुस...


Belgam News | वेगा हेल्मेट कंपनीची मालमत्ता जप्त करा

बेळगाव : वेगा हेल्मेट कंपनीने सात कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे, त्यांना तीन नोटिसा देण्यात आल्या असून आता शेवटची नोटीस बजावण्यात यावी. त्यानंतरही मुदतीत कर भरला नाही तर मालमत्ता जप्तीची कारवाई करावी, अशा सूचना मंगळवारी (दि. 17) महापालिका सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आल्या. महापौर मंगेश पवार अध्यक्षस्थानी होते. बैठक सुर...


Shivaji Maharaj Museum in New Delhi | दिल्लीत घडणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दर्शन

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या काळातील ऐतिहासिक घटनांची अनुभूती उत्तर भारतातील आणि राजधानी दिल्लीतील तरुणांना आणि नागरिकांना घेता आली पाहिजे. यासाठी दिल्लीतील कुतुब इन्स्टिट्यूशनल भागामध्ये आधुनिक पद्धतीचे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लवकरच ...


Child health crisis | मिरा-भाईंदरमध्ये 139 बालके कुपोषित

भाईंदर : मिरा-भाईंदर या झपाट्याने विकसित होणार्‍या शहरात एकूण 139 बालके कुपोषित असून त्यातील 9 बालके अतिकुपोषित असल्याची धक्कादायक बाब आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या पालिकेतील भेटीदरम्यान समोर आली आहे. या बालकांवरील उपचारासाठी त्याच्या आहारावरील नियंत्रणासाठी त्रिदस्यीय पथक काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिरा-भाईंदर श...


Palghar News : घोळ येथील पुलावर धोकादायक खड्डा

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोळ येथील नाल्याजवळील पुलावर मोठा खड्डा पडल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. महामार्गावरील नवीन सिमेंट काँक्रीटकरणाचे काम अंतिम टप्प्यात असूनही अनेक ठिक...


Bridge work stalled Zarikhadi : झरीखाडी नवीन पुलाचे काम संथ गतीने

तलासरी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गुजरात राज्याला जोडणार्‍या तलासरी-उंबरगाव मार्गावरील झरीखाडी येथे नवीन पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू असल्याने पंधरा ते अठरा गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाळ्यात दहा ते बारा किलोमीटरचा फेरा घालून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे. तलासरी-उंबरगाव मार्गावरील झरी खाडी येथे ...


Sharad Pawar Full Speech : भाजपसह गेलेले संधीसाधू, आता सोबत घेणार नाही, पवारांचं वक्तव्य ABP MAJHA

Sharad Pawar and Ajit Pawar NCP: सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत (BJP) गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. ते मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळल्याची चर्चा सुरु झाली आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.


Mumbai road closure : ठाकूरद्वार-चर्नी रोड स्थानक रस्ता बंद

मुंबई : गिरगावातील ठाकूरद्वार जंक्शनवर सोमवारी रस्ता खचून बेस्ट बस अडकल्याची दुर्घटना घडली होती. मेट्रोच्या या कारभाराचा त्रास आता पुढील काही दिवस प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. येथील दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून ठाकूरद्वार ते चर्नी रोड स्थानक रस्ता काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. येथील दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत होण्यास चार ते...